शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभाची क्रेझ, डिजिटलची झलक

By admin | Updated: October 8, 2015 20:52 IST

संध्याकाळच्या वेळी नेहमीच्या कट्टय़ावर आम्ही चार मित्र चहा पीत बसलो होतो. आज कुछ तुफानी करते है, म्हणायची सवयच. पण आज जरा जास्तच मनावर घेत सगळेच पेटले होते.

 संध्याकाळच्या वेळी नेहमीच्या कट्टय़ावर आम्ही चार मित्र चहा पीत बसलो होतो. आज कुछ तुफानी करते है, म्हणायची सवयच. पण आज जरा जास्तच मनावर घेत सगळेच पेटले होते. मग काय ठरलं आणि आम्ही पर्वणीच्या दिवशी नाशिक गाठायचं ठरवलं. खिशात घरून आलेला पॉकेटमनी होताच. आतापर्यंत घरच्यांची परवानगी घेणं हे प्रकार आमच्या चौघांपैकी कुणालाच जमला नाही म्हणा किंवा आम्ही स्वत:ला तेवढे शहाणो समजतो असं म्हणा, त्यामुळे विचारलं कुणालाच नाही. तडक नाशिक गाठलं. 

पर्वणीच्या एक दिवस अगोदर आम्ही नाशकात पोहचलो. थंडी, पाऊस आणि काही भक्त, काही श्रद्धाळू अन् त्यात आम्ही दीड नाही, चार शहाणो भिजत होतो. रात्रभर गोदावरी हसत होती, नाचत होती, गात होती, तरीही ती शांत भासत होती. त्या गर्दीतला प्रत्येक व्यक्ती स्वत:शीच बोलायचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याच गोदावरीच्या रामघाटामध्ये एका काठावरून ते दुस:या काठार्पयत पाण्यात गिरक्या घेत अन कोलांटय़ाउडय़ा मारत एक लहान 12 वर्षाची मुलगी पोहत होती. तिला हाका मारत, बोलावत आमच्या दिशेनं ये असं सांगितलं. ती तशी ओली, थंडीत कुडकुडत होती. तिला  कुतूहलानं विचारलं, ‘तुझं नाव काय? स्विमिंग कशी शिकलीस?’ 
‘कोमल कुशिरे’ नाव होतं तिचं.  स्विमिंग या शब्दाचा अर्थ तिला कळेना. ‘तू पोहणं कुठं शिकली?’ असं विचारल्यावर ती म्हणाली, कुणी कशाला शिकवेल, मला येतं लहानपणापासूनच पोहता!
अशा ब:याच गप्पा झाल्या. मग कौतुकानं तिला एक चॉकलेट दिलं तर  ती खूश झाली. पण ते तोंडात टाकणार तेवढय़ात तिच्या तोंडात रुपयाचं नाणं दिसलं. तेव्हा लक्षात आलं की ही लोकांनी पाण्यात टाकलेले पैसे गोळा करते. दररोज किती पैसे मिळतात, असे विचारलं तर म्हणाली, सापडतात शंभर-दोनशे रुपये!  
चहापाण्यावर सहज पॉकेटमनीतून शे-दीडशे उडवणारे आमच्यासारखे आणि ही पोहून पोहून जिवाचं रान करणारी मुलगी अशी तुलना नकळत मनाशी केलीच. 
कुणाच्या वाटय़ाला काय जगणं आणि कसं तारुण्य येतं, प्रश्नच पडला मनाला.
पण उत्तर नव्हतं.
तसेच प्रश्न घेऊन मग नाशिकच्या साधुग्रामात गेलो. 
अवतीभवती बरेच तरुणही होते.
बरेचसे क्रे झ म्हणून, आवड म्हणून, शोध म्हणून, तर काही जीवनातील नैराश्याला वाट मोकळी करत, सुखाच्या व्याख्या शोधत फिरताहेत असं वाटलं.  काही हौस म्हणून, काही अभ्यास म्हणून, काही नैराश्याने वैतागलेले, काही भरकटलेले, तर काही बेरोजगार, काही विनाकारण विरंगुळा म्हणून आलेले असावेत. स्वयंसेवी संस्थांमध्ये सहभागी होत, दिवसरात्र पावसात सेवा देणारे तरु णदेखील तिथे होते. एकीकडे विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या तरु णांचा लोंढा, तर एकीकडे समाधान म्हणून समाजसेवा करणारा तरु णांचा सहभाग. एकीकडे डिजिटल इंडियाला साद घालणारा भारत, तर दुसरीकडे रामघाटावर स्नान करणारा भारत. हा विरोधाभासच होता. 
त्यात काही तृतीयपंथीही दिसले. या सोहळ्यात त्यांचा सहभाग असतो का, असा मला प्रश्न पडला. 
पण उत्तर वेगळंच सापडलं. तिथे ‘सखी’ हा तृतीयपंथी संप्रदायाचाही सहभाग होता. राधा आणि कृष्णा यांच्या अतूट प्रेमावर प्रचंड श्रद्धा आणि  विश्वास असलेला हा संप्रदाय आहे.  सखी आखाडय़ाचा उदय हा 1988 मध्ये बिहार येथे झाला. महंत विशाखा हे या आखाडय़ाचे महामंडलेश्वर आहेत. रामरथी नावाच्या एका तृतीयपंथी व्यक्तीने सखी संप्रदायाची माहिती दिली. तेव्हा आज प्रत्यक्षपणो जरी समाज तृतीयपंथींना सहभागी करून घेत नसला, तरी यांनी आपले वेगळे अस्तित्व मान्य केले आहे. स्वीकारले आहे. 
एका वेगळ्याच धार्मिक सोहळ्यातला हा स्वीकार अत्यंत वेगळा आणि आनंददायीही वाटला. 
किती वेगळी माणसं, समाज, वर्ग, भाषा इथे जमले होते. सारेच वेगळे होते. समजून घ्यावे असे प्रश्न होते. उत्तरं मिळालीच असं नाही, पण तरी एक नवीन जग दिसलं हे नक्की!
कुंभातल्या या सफरीनं आणखी एक नजर दिली, असं मात्र नक्की वाटतं!
- स्नेहा मगर
पुणो