शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

अंजीरवाला शेतकरी इंजिनिअर झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 08:05 IST

इंजिनिअरिंगची नोकरी सोडून त्यानं अंजीराची शेती करायची ठरवली आणि थेट विक्री व्यवस्थेतही उतरला..

-दीपक कुलकर्णी

पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत कुणी गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला तर त्याला लोक नक्कीच वेडे ठरवतील; पण त्याने ठाम निश्चय केला. अनेकांचा विरोध पत्करून तो गावी परतला. त्याला शेतीच करायची होती. नवनवीन प्रयोगाविषयी माहिती घेत त्यानं आपल्या अडीच एकराच्या शेतीत अंजिराचं पीक घेण्याचं ठरवलं. आता बघता बघता तो अडीच कोटीपर्यंत उलाढाल करतो आहे.

दौंड तालुक्यातील खोर येथील डोंबेवाडीचा हा तरुण. समीर डोंबे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं चारचौघांसारखा नोकरीचा रस्ता धरला. आठ वर्षांपूर्वी तब्बल ४० हजार महिना मिळवत सुरुवातदेखील जबरदस्त झाली; पण समीरला वाटत होतं की, आपण शेतीच करायला हवी. कुटुंब मित्र यांचा विरोध स्वीकारत त्यानं २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठलं. नवनवीन अभिनव प्रयोगांमार्फत त्यानं अंजिराची शेती फुलवली. उत्पादन करूनच न थांबता वितरण आणि विक्रीतदेखील सहभागी होत व्यवसायाची नवी पद्धत अवलंबली. बाजारपेठेऐवजी थेट विक्रीला प्राधान्य दिलं.

समीर सांगतो, मी पुण्यातील नोकरी सोडली, तेव्हा सारे म्हणाले की, काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहे. शेतीतून कुणाचं भलं झालं आहे का? शेती करणाऱ्या मुलाला कुणी मुलगी देत नाही, तुझं लग्न कसं होणार? पण मी ठरवलं आपण शेतीत काम करू, तेच आपलं उत्तर. तसं आमच्या शेतीत आजोबांपासून अंजिराची लागवड व्हायची; पण ते बाजारपेठांमध्ये तुटपुंज्या किमतीत विकून मोकळे होत असत. मी हा दृष्टिकोन बदलत अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत अंजिराचे पीक घेत आणि आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना आखली. स्वतःचा ''पवित्रक'' नावाचा एक ब्रॅण्ड रजिस्टर करून घेतला. आकर्षक पॅकिंगसह अंजीर बाजारात विक्रीला आणले. विक्रीसाठी मोठमोठ्या कंपनींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. हळूहळू मग रिलायन्स, बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये आमचे प्रॉडक्ट विक्रीस सुरुवात केली. आम्ही अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणेदेखील सुरू केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तरुण पिढीने जर स्वतःच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग जर आपल्या परंपरागत कृषी व्यवसायासाठी केला तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.’

समीर आता गावच्या इतर शेतकऱ्यांसोबतही मिळून नव्या प्रकल्पाची तयारी करत आहे.

--------------------------------------------------------------

ॲग्रिकल्चरची मुलं आणि स्पर्धा परीक्षांचा चक्रव्यूह

ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या घेऊन पुढे एमपीएससी आणि यूपीएससीच्या चक्रव्यूहात अडकलेले मला अनेक जण दिसतात. वर्षानुवर्षे परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची करतात. यातून काही जणांना यशदेखील मिळते; पण त्यापैकी मोठ्या संख्येचा तरुण वर्ग हा उमेदीचा काळ गमावून बसतो. ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेल्या तरुणांनी शेतीत उत्तम काम करावं. शेतीला स्कोप नाही कसा,जोवर मानव जात जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही. शेतीत स्कोप आहे, फक्त आपण कल्पकपणे काम करायला हवं, असं समीर सांगतो.

 

(दीपक लोकमत ऑनलाइनमध्ये उप-संपादक म्हणून कार्यरत आहेत.)

kulkarnideepak4888@gmail.com