शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

अंजीरवाला शेतकरी इंजिनिअर झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 08:05 IST

इंजिनिअरिंगची नोकरी सोडून त्यानं अंजीराची शेती करायची ठरवली आणि थेट विक्री व्यवस्थेतही उतरला..

-दीपक कुलकर्णी

पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत कुणी गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला तर त्याला लोक नक्कीच वेडे ठरवतील; पण त्याने ठाम निश्चय केला. अनेकांचा विरोध पत्करून तो गावी परतला. त्याला शेतीच करायची होती. नवनवीन प्रयोगाविषयी माहिती घेत त्यानं आपल्या अडीच एकराच्या शेतीत अंजिराचं पीक घेण्याचं ठरवलं. आता बघता बघता तो अडीच कोटीपर्यंत उलाढाल करतो आहे.

दौंड तालुक्यातील खोर येथील डोंबेवाडीचा हा तरुण. समीर डोंबे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं चारचौघांसारखा नोकरीचा रस्ता धरला. आठ वर्षांपूर्वी तब्बल ४० हजार महिना मिळवत सुरुवातदेखील जबरदस्त झाली; पण समीरला वाटत होतं की, आपण शेतीच करायला हवी. कुटुंब मित्र यांचा विरोध स्वीकारत त्यानं २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठलं. नवनवीन अभिनव प्रयोगांमार्फत त्यानं अंजिराची शेती फुलवली. उत्पादन करूनच न थांबता वितरण आणि विक्रीतदेखील सहभागी होत व्यवसायाची नवी पद्धत अवलंबली. बाजारपेठेऐवजी थेट विक्रीला प्राधान्य दिलं.

समीर सांगतो, मी पुण्यातील नोकरी सोडली, तेव्हा सारे म्हणाले की, काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहे. शेतीतून कुणाचं भलं झालं आहे का? शेती करणाऱ्या मुलाला कुणी मुलगी देत नाही, तुझं लग्न कसं होणार? पण मी ठरवलं आपण शेतीत काम करू, तेच आपलं उत्तर. तसं आमच्या शेतीत आजोबांपासून अंजिराची लागवड व्हायची; पण ते बाजारपेठांमध्ये तुटपुंज्या किमतीत विकून मोकळे होत असत. मी हा दृष्टिकोन बदलत अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत अंजिराचे पीक घेत आणि आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना आखली. स्वतःचा ''पवित्रक'' नावाचा एक ब्रॅण्ड रजिस्टर करून घेतला. आकर्षक पॅकिंगसह अंजीर बाजारात विक्रीला आणले. विक्रीसाठी मोठमोठ्या कंपनींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. हळूहळू मग रिलायन्स, बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये आमचे प्रॉडक्ट विक्रीस सुरुवात केली. आम्ही अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणेदेखील सुरू केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तरुण पिढीने जर स्वतःच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग जर आपल्या परंपरागत कृषी व्यवसायासाठी केला तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.’

समीर आता गावच्या इतर शेतकऱ्यांसोबतही मिळून नव्या प्रकल्पाची तयारी करत आहे.

--------------------------------------------------------------

ॲग्रिकल्चरची मुलं आणि स्पर्धा परीक्षांचा चक्रव्यूह

ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या घेऊन पुढे एमपीएससी आणि यूपीएससीच्या चक्रव्यूहात अडकलेले मला अनेक जण दिसतात. वर्षानुवर्षे परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची करतात. यातून काही जणांना यशदेखील मिळते; पण त्यापैकी मोठ्या संख्येचा तरुण वर्ग हा उमेदीचा काळ गमावून बसतो. ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेल्या तरुणांनी शेतीत उत्तम काम करावं. शेतीला स्कोप नाही कसा,जोवर मानव जात जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही. शेतीत स्कोप आहे, फक्त आपण कल्पकपणे काम करायला हवं, असं समीर सांगतो.

 

(दीपक लोकमत ऑनलाइनमध्ये उप-संपादक म्हणून कार्यरत आहेत.)

kulkarnideepak4888@gmail.com