शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अंजीरवाला शेतकरी इंजिनिअर झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 08:05 IST

इंजिनिअरिंगची नोकरी सोडून त्यानं अंजीराची शेती करायची ठरवली आणि थेट विक्री व्यवस्थेतही उतरला..

-दीपक कुलकर्णी

पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत कुणी गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला तर त्याला लोक नक्कीच वेडे ठरवतील; पण त्याने ठाम निश्चय केला. अनेकांचा विरोध पत्करून तो गावी परतला. त्याला शेतीच करायची होती. नवनवीन प्रयोगाविषयी माहिती घेत त्यानं आपल्या अडीच एकराच्या शेतीत अंजिराचं पीक घेण्याचं ठरवलं. आता बघता बघता तो अडीच कोटीपर्यंत उलाढाल करतो आहे.

दौंड तालुक्यातील खोर येथील डोंबेवाडीचा हा तरुण. समीर डोंबे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं चारचौघांसारखा नोकरीचा रस्ता धरला. आठ वर्षांपूर्वी तब्बल ४० हजार महिना मिळवत सुरुवातदेखील जबरदस्त झाली; पण समीरला वाटत होतं की, आपण शेतीच करायला हवी. कुटुंब मित्र यांचा विरोध स्वीकारत त्यानं २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठलं. नवनवीन अभिनव प्रयोगांमार्फत त्यानं अंजिराची शेती फुलवली. उत्पादन करूनच न थांबता वितरण आणि विक्रीतदेखील सहभागी होत व्यवसायाची नवी पद्धत अवलंबली. बाजारपेठेऐवजी थेट विक्रीला प्राधान्य दिलं.

समीर सांगतो, मी पुण्यातील नोकरी सोडली, तेव्हा सारे म्हणाले की, काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहे. शेतीतून कुणाचं भलं झालं आहे का? शेती करणाऱ्या मुलाला कुणी मुलगी देत नाही, तुझं लग्न कसं होणार? पण मी ठरवलं आपण शेतीत काम करू, तेच आपलं उत्तर. तसं आमच्या शेतीत आजोबांपासून अंजिराची लागवड व्हायची; पण ते बाजारपेठांमध्ये तुटपुंज्या किमतीत विकून मोकळे होत असत. मी हा दृष्टिकोन बदलत अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत अंजिराचे पीक घेत आणि आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना आखली. स्वतःचा ''पवित्रक'' नावाचा एक ब्रॅण्ड रजिस्टर करून घेतला. आकर्षक पॅकिंगसह अंजीर बाजारात विक्रीला आणले. विक्रीसाठी मोठमोठ्या कंपनींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. हळूहळू मग रिलायन्स, बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये आमचे प्रॉडक्ट विक्रीस सुरुवात केली. आम्ही अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणेदेखील सुरू केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तरुण पिढीने जर स्वतःच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग जर आपल्या परंपरागत कृषी व्यवसायासाठी केला तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.’

समीर आता गावच्या इतर शेतकऱ्यांसोबतही मिळून नव्या प्रकल्पाची तयारी करत आहे.

--------------------------------------------------------------

ॲग्रिकल्चरची मुलं आणि स्पर्धा परीक्षांचा चक्रव्यूह

ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या घेऊन पुढे एमपीएससी आणि यूपीएससीच्या चक्रव्यूहात अडकलेले मला अनेक जण दिसतात. वर्षानुवर्षे परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची करतात. यातून काही जणांना यशदेखील मिळते; पण त्यापैकी मोठ्या संख्येचा तरुण वर्ग हा उमेदीचा काळ गमावून बसतो. ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेल्या तरुणांनी शेतीत उत्तम काम करावं. शेतीला स्कोप नाही कसा,जोवर मानव जात जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही. शेतीत स्कोप आहे, फक्त आपण कल्पकपणे काम करायला हवं, असं समीर सांगतो.

 

(दीपक लोकमत ऑनलाइनमध्ये उप-संपादक म्हणून कार्यरत आहेत.)

kulkarnideepak4888@gmail.com