शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भाऊबीज गेटटुगेदर दिवसाचं रूटीन एकच.

By admin | Updated: November 5, 2015 21:44 IST

खाणंपिणं-भटकणं-पत्ते-गप्पा आणि नाश्त्याला उरसुर चिवडा घालून खायची मिसळ. हा लहानपणाचा निवांतपणा जगायचा म्हणून तर येते

- निकिता पाटील

 
गप्पा.जेवणं.गप्पा
खाणंपिणं-भटकणं-पत्ते-गप्पा 
आणि नाश्त्याला उरसुर चिवडा घालून
खायची मिसळ.
हा लहानपणाचा निवांतपणा
जगायचा म्हणून तर येते
दरवर्षी दिवाळी
ॅदिवाळीत भेटतोहेस ना?
भाऊबीज गेटटुगेदर?
त्या दिवशी रात्री पत्त्यांचा डाव टाकू?
आणि कुणीतरी तेवढी उरसुर चिवडा मिसळ तेवढी प्लॅन करा दुस:या दिवशी सकाळी?
बाकी काही नको!
-हे असे मेसेज आत्ताच व्हॉट्सअॅपच्या ‘फॅमिली ग्रुप्स’मधे फिरायला लागलेत.
एरव्ही खरं तर व्हॉट्सअॅपवरचे फॅमिली ग्रुप ‘टच’मधे राहू म्हणत तयार होतात.
पहिले दोनतीन दिवस खूप बकबक होते. मग थंडावतात. मग कुठूनतरी एखादा फॉरवर्ड एखाददुसरा मारतो किंवा मग गाडीबिडी घेतली, परीक्षेत पहिला-दुसरा, आजारपण एवढय़ापुरताच तो ग्रुप उरतो!
पण दिवाळीचं तसं नाही!
यंदा तर दस:यानंतरच दिवाळीचं फॅमिली गेटटुगेदरचं प्लॅनिंग अनेक ग्रुप्सने करून टाकलंय.
एरव्ही पाटर्य़ा, गेटटुगेदर, रियुनियन हे सारं आता कुणालाच नवीन राहिलेलं नाही.
पण लहानपणी आजोळी किंवा मामा-मावशीच्या घरी साज:या केलेल्या दिवाळीची, त्यातल्या मजेची सर पुन्हा याद करायची. पुन्हा तेच गप्पांचे फड रंगवायचे. पत्ते कुटायचे आणि चहावर चहा मारत सकाळी नाश्त्याला मिसळ नाहीतर मग भजी-थालीपीठं मारायची.
दिवसभर गप्पा. जेवणं. गप्पा. खाणंपिणं-भटकणं-पत्ते-
हा सारा कार्यक्रम दोन-तीन दिवस सलग चालू ठेवायचा.
असे एकेकाळचे दिवस होते.
आता तरुण होता होता तो निवांतपणा तर मागेच पडला.
पण निदान दिवाळीच्या भाऊबिजेच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या रविवारी तरी पुन्हा भेटायचं असं प्लॅनिंग आता व्हॉट्सअॅपवर होऊ लागलंय.
कारण त्या गेटटुगेदरची आणि हसून हसून जागवलेल्या रात्रींची सर कशालाही एरव्ही येत नाही..
त्यासा:याची मजा फक्त दिवाळीतच..
मग आतेमामे-मावसमामे-चुलतचुलत- सख्खेचुलत भावंड आणि बहिणी भेटतात.
पुन्हा नव्यानं लहान होतात.
एकमेकांच्या खोडय़ा काढतात.
लहानपणीच्या नावानं चिडवतात.
चिडतात.
हसतात.
आणि आपलं सारं बालपण पुन्हा जगून घेतात.
वर्षभरासाठी.
व्हॉट्सअॅपनं हरवलेली ही नाती पुन्हा वेगळ्या अर्थानं जवळ आणायला सुरुवात केली आहे.
थोडीशी धुसफूस, दुरावलेले संबंध, न बोलल्यानं आलेला दुरावा, हरवलेलं शेअरिंग. पद आणि शिक्षणानं बदललेली परिस्थिती. कामाचं प्रेशर, मित्रंचा गोतावळा. हे सारं तर प्रत्येकाच्या भोवती असतं. प्रत्येकजणच त्यात आपापलं समाधान शोधत ‘रेस’ लावल्यागत पळतो.
त्यात कुटुंब विस्तारतं.
मित्र आणि सहकारी जास्त जवळ येतात.
रोजच्या जगण्याचा भाग होतात.
पण मग ही नाती?
ती तर का लांब रहावीत?
आणि जवळ आली की तुझं-माझं करत का काचावीत?
ती काचू नयेत, म्हणून तर ही भाऊबीज गेटटुगेदर हवीत.
त्यानं मनं जवळ येतात.
येऊ शकतात, असं तरी वाटू लागतं.
म्हणूनच तर यंदाही अनेकजणांनी आपल्या बिझी शेडय़ुलमधून एक दिवस या भाऊबीज गेटटुगेदरसाठी काढायचं ठरवलंय!
मनापासून!
स्वत:साठी, स्वत:चं बालपण जगायचं ठरवलंय!