शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

...तर कामकाज ठप्प होईल

By admin | Updated: November 2, 2016 07:04 IST

लोढा समितीला पाठविलेल्या पत्राच्या बाबतीत जर समितीने योग्य वेळेत उत्तर न दिल्यास आपले कामकाज ठप्प पडू शकते

नवी दिल्ली : आपल्या कार्यप्रणालीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांकडे पाहता, लोढा समितीला पाठविलेल्या पत्राच्या बाबतीत जर समितीने योग्य वेळेत उत्तर न दिल्यास आपले कामकाज ठप्प पडू शकते, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबरला बीसीसीआयला निर्देश दिल्यानंतर बोर्डाचे सचिव अजय शिर्के यांनी लोढा समितीला पत्राद्वारे पुढील कामकाजच्या पद्धतीविषयी विचारले होते. मात्र, समितीकडून अद्याप याविषयी कोणतेही उत्तर मिळाले नाही. यावर बीसीसीआयने भीती व्यक्त करताना सांगितले, की जर समितीची भूमिका अशीच नकारात्मक राहिली, तर निश्चितच बोर्डाचे कामकाज थांबेल.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीसीसीआय लोढा समितीच्या सहमतीशिवाय कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकत नाही. त्यातच या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये आगामी इंग्लंडविरुद्धची द्विपक्षीय मालिका, आयपीएलच्या मीडिया अधिकाऱ्यांशी संबंधित तारखांच्या निर्णयांसह इतर निर्णयांचाही समावेश आहे.सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबरला लोढा समितीला निर्देश दिले होते, की त्यांनी बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहाराची मर्यादा निश्चित करावी. सर्वोच्च न्यायालयाने समितीला आपला आॅडिटर नेमण्यासही सांगितले होते आणि मोठ्या प्रमाणात दिलेल्या पैशांची आणि खात्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते.त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला सुनावले होते, की जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींना लागू केले जात नाही, तोपर्यंत बीसीसीआय आपल्याशी संलग्न राज्य संघटनांना कोणत्याही प्रकारे आर्थिक साह्य देऊ शकणार नाही. (वृत्तसंस्था) >इंग्लंडविरुद्धची मालिका धोक्यात?दरम्यान, समितीकडून लवकर उत्तर न आल्यास नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका धोक्यात येणार असल्याचेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, समितीच्या सहमतीशिवाय मालिकेतील सामन्यांचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनांना आर्थिक पाठबळ देता येणार नाही, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्याने म्हटले. याबाबतीत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आम्ही बोर्डच्या कामकाजाच्या स्पष्टीकरणासाठी समितीला ई-मेल पाठवला आहे. मात्र आम्हाला भीती आहे, की समितीने यावर लवकर उत्तर दिले नाही तर बोर्डाचे कामकाज बंद पडू शकते. समितीने कालपर्यंत यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसून, त्यांच्याकडून याबाबत कोणतेही वक्तव्य झालेले नाही.’’