शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही वाया

By admin | Updated: November 17, 2015 03:11 IST

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया गेला. रविवारी पावसामुळे

बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया गेला. रविवारी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आल्यानंतर सोमवारीही पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही खेळाडूंना मैदानात जाता आले नाही. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. सोमवारीही तुरळक पाऊस सुरू होता. त्यामुळे खेळ शक्य झाला नाही. सकाळचे सत्र संपण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी शिल्लक असतानाही पाऊस थांबला नव्हता. त्यानंतर मैदानाची दुसऱ्यांदा पाहणी करण्यात आली. पावसाची शक्यता आणि मैदानावरील पाणी बघितल्यानंतर सध्या खेळ शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवशीही पूर्ण खेळ होण्याची शक्यता धूसर आहे. मंगळवारी सव्वानऊला खेळ सुरू होणार आहे, पण हे सर्व काही हवामानावर अवलंबून आहे. बंगळुरूमध्ये दुसरा कसोटी सामना प्रारंभ होण्यापूर्वी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती, पण पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये पावसाचा अडथळा निर्माण झाला नाही. पहिल्या दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव २१४ धावांत संपुष्टात आला. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद ८० धावांची मजल मारली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाने वर्चस्व गाजवले. त्यामुळे दोन दिवस खेळ शक्य झाला नाही. (वृत्तसंस्था)दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आल्यामुळे सामन्यावर पकड निर्माण करण्याच्या भारतीय संघाच्या प्रयत्नांना खीळ बसली. सोमवारी तिसऱ्या दिवशीही खेळ शक्य न झाल्यामुळे सामना निकाली ठरण्याची शक्यता धूसर होत आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १३४ धावांची गरज आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय (नाबाद २८) आणि शिखर धवन (नाबाद ४५) खेळपट्टीवर होते. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.