शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही वाया

By admin | Updated: November 17, 2015 03:11 IST

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया गेला. रविवारी पावसामुळे

बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया गेला. रविवारी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आल्यानंतर सोमवारीही पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही खेळाडूंना मैदानात जाता आले नाही. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. सोमवारीही तुरळक पाऊस सुरू होता. त्यामुळे खेळ शक्य झाला नाही. सकाळचे सत्र संपण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी शिल्लक असतानाही पाऊस थांबला नव्हता. त्यानंतर मैदानाची दुसऱ्यांदा पाहणी करण्यात आली. पावसाची शक्यता आणि मैदानावरील पाणी बघितल्यानंतर सध्या खेळ शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवशीही पूर्ण खेळ होण्याची शक्यता धूसर आहे. मंगळवारी सव्वानऊला खेळ सुरू होणार आहे, पण हे सर्व काही हवामानावर अवलंबून आहे. बंगळुरूमध्ये दुसरा कसोटी सामना प्रारंभ होण्यापूर्वी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती, पण पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये पावसाचा अडथळा निर्माण झाला नाही. पहिल्या दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव २१४ धावांत संपुष्टात आला. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद ८० धावांची मजल मारली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाने वर्चस्व गाजवले. त्यामुळे दोन दिवस खेळ शक्य झाला नाही. (वृत्तसंस्था)दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आल्यामुळे सामन्यावर पकड निर्माण करण्याच्या भारतीय संघाच्या प्रयत्नांना खीळ बसली. सोमवारी तिसऱ्या दिवशीही खेळ शक्य न झाल्यामुळे सामना निकाली ठरण्याची शक्यता धूसर होत आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १३४ धावांची गरज आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय (नाबाद २८) आणि शिखर धवन (नाबाद ४५) खेळपट्टीवर होते. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.