शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

इंग्लंडपुढे आर. आश्विनचे सर्वांत मोठे आव्हान

By admin | Updated: November 4, 2016 04:20 IST

भारत दौऱ्यात इंग्लंड फलंदाजांपुढे स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे सर्वांत मोठे आव्हान राहणार

लंडन : भारत दौऱ्यात इंग्लंड फलंदाजांपुढे स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे सर्वांत मोठे आव्हान राहणार असून, त्याच्याविरुद्ध खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे मत इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत ९ नोव्हेंबरपासून राजकोटमध्ये सुरू होत आहे. भारताने १५ सदस्यांच्या संघात ३ फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. त्यांत रविचंद्रन आश्विन, अमित मिश्रा व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. इंग्लंड संघ २०१२मध्ये भारत दौऱ्यावर आला होता, त्या वेळी आश्विनने ४ सामन्यांत केवळ १४ बळी घेतले होते; पण त्यानंतर आश्विनच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून येते.पीटरसन म्हणाला, ‘‘आश्विन शानदार गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता असून, तो फलंदाजांना नेहमी अडचणीत आणतो. तो नेहमी आक्रमक गोलंदाजी करतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास प्रयत्नशील असतो.’’ आश्विनने भारतात खेळलेल्या २२ कसोटी सामन्यांत आतापर्यंत १५३ बळी घेतले आहेत.२०११नंतर मायदेशात खेळल्या गेलेल्या लढतीत प्रत्येक विजयात आश्विनने योगदान दिले आहे. भारताने अलीकडेच न्यूझीलंडचा ३-० ने सफाया केला. आश्विनने त्या मालिकेत २७ बळी घेऊन ‘मालिकावीरा’चा पुरस्कार पटकावला. मालिकेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर आश्विनने आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. पीटरसन स्वत:च्या फलंदाजीबाबत म्हणाला, ‘‘भारतात चौकार सहज मिळत नाहीत. त्यासाठी स्ट्राइक रोटेट करणे आवश्यक असते. ज्या वेळी मी फलंदाजी करीत होतो, त्या वेळी हेच तंत्र अवलंबले होते. मी भारतात फलंदाजीचा पूर्ण आनंद घेतला आणि अधिक धावा फटकावल्या.’’इंग्लंड संघाने यापूर्वीच्या भारत दौऱ्यात २-१ ने मालिका जिंकली होती. त्या मालिकेत पीटरसनने ३३८ धावा फटकावल्या होत्या. पीटरसनने इंग्लंडला आश्विनव्यतिरिक्त स्टार फलंदाज विराट कोहलीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पीटरसन म्हणाला, ‘‘कोहली सध्या शानदार फॉर्मात आहे. इंग्लंड संघात फॉर्मात असलेल्या जो रुटचा समावेश आहे; पण रुटची कोहलीसोबत तुलना करणे चुकीचे ठरेल. कोहली नेहमी आक्रमक क्रिकेट खेळण्यास प्रयत्नशील असतो. त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. तो स्वत: चकमदार कामगिरी करून सहकाऱ्यांपुढे आदर्श ठेवतो.’’ (वृत्तसंस्था) >आश्विनचा ‘दुसरा’ इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. मी त्याच्याविरुद्ध खेळलो त्या वेळी ‘दुसरा’ खेळण्यास सक्षम होतो; पण सध्याच्या संघातील फलंदाजांना ‘दुसरा’ खेळताना अडचण भासू शकते. भारतात फिरकीपटूंचा चेंडू अधिक उसळत नसल्यामुळे फलंदाजांना तो समजण्यास अडचण येते. हा सर्व खेळाचा भाग असून, भारतात खेळताना या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असायला हवे.-केविन पीटरसन