शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

पाक प्रसारमाध्यमांचा बीसीसीआयवर हल्ला

By admin | Updated: November 19, 2015 04:45 IST

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) वेगवेगळी वादग्रस्त विधाने करीत असताना आता यामध्ये

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) वेगवेगळी वादग्रस्त विधाने करीत असताना आता यामध्ये पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी देखील उडी घेतली आहे. भारत-पाक संभाव्य द्विपक्षीय मालिकेच्या वादाला आणखी तीव्र करताना पाक मीडियाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) भूमिका योग्य नसून, त्यामध्ये स्वार्थपणा दिसून येत आहे, असे म्हटले आहे.पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये ‘बीसीसीआयची अयोग्य भावना’ या मथळ्याखाली लिहिले आहे की, पाकिस्तानविरुद्ध यूएईमध्ये खेळण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे. यावरून त्यांच्यातील स्वार्थ स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच बीसीसीआय द्विपक्षीय क्रिकेट संबंधाचा सन्मानही नाही करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या भविष्य दौरा कार्यक्रमानुसार (एफटीपी) दोन्ही देशांदरम्यान दहा वर्षांसाठी सामन्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.भारत-पाक यांच्यात सातत्याने वाढणाऱ्या वादांमुळे संभाव्य मालिकेसंबधी संभ्रम निर्माण झाले आहेत. त्याच वेळी बीसीसीआयने मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका भारतात खेळविण्याचा प्रस्तावही पीसीबीसमोर ठेवला आहे. या सर्व घडामोडींनुसार पाक मीडियाने थेट भारतीय स्थितींवर हल्ला करताना सांगितले की, भारतासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. तसेच, मुसलमानांविरोधात हिंसा आणि गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. शिवाय शिवसेनेकडून पाक नागरिकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मात्र, ही मालिका भारतात खेळविण्यामागचे कारण वेगळेच आहे. जर का ही मालिका भारतात खेळवली गेली तर प्रसारण अधिकार, तिकीटविक्री आणि जाहिराती हे सर्व भारताकडे राहील. मात्र, हीच मालिका यूएईमध्ये खेळविल्यास हे सर्व अधिकार पाकिस्तानला मिळतील. याच वृत्तपत्राने आणखी आग ओकताना लिहिले की, भारताच्या या ब्लॅकमेलिंगला रोखण्यासाठी पाक सरकार आणि पीसीबी अध्यक्ष चांगले प्रयत्न करीत आहेत.(वृत्तसंस्था)