शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पाक प्रसारमाध्यमांचा बीसीसीआयवर हल्ला

By admin | Updated: November 19, 2015 04:45 IST

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) वेगवेगळी वादग्रस्त विधाने करीत असताना आता यामध्ये

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) वेगवेगळी वादग्रस्त विधाने करीत असताना आता यामध्ये पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी देखील उडी घेतली आहे. भारत-पाक संभाव्य द्विपक्षीय मालिकेच्या वादाला आणखी तीव्र करताना पाक मीडियाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) भूमिका योग्य नसून, त्यामध्ये स्वार्थपणा दिसून येत आहे, असे म्हटले आहे.पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये ‘बीसीसीआयची अयोग्य भावना’ या मथळ्याखाली लिहिले आहे की, पाकिस्तानविरुद्ध यूएईमध्ये खेळण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे. यावरून त्यांच्यातील स्वार्थ स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच बीसीसीआय द्विपक्षीय क्रिकेट संबंधाचा सन्मानही नाही करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या भविष्य दौरा कार्यक्रमानुसार (एफटीपी) दोन्ही देशांदरम्यान दहा वर्षांसाठी सामन्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.भारत-पाक यांच्यात सातत्याने वाढणाऱ्या वादांमुळे संभाव्य मालिकेसंबधी संभ्रम निर्माण झाले आहेत. त्याच वेळी बीसीसीआयने मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका भारतात खेळविण्याचा प्रस्तावही पीसीबीसमोर ठेवला आहे. या सर्व घडामोडींनुसार पाक मीडियाने थेट भारतीय स्थितींवर हल्ला करताना सांगितले की, भारतासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. तसेच, मुसलमानांविरोधात हिंसा आणि गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. शिवाय शिवसेनेकडून पाक नागरिकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मात्र, ही मालिका भारतात खेळविण्यामागचे कारण वेगळेच आहे. जर का ही मालिका भारतात खेळवली गेली तर प्रसारण अधिकार, तिकीटविक्री आणि जाहिराती हे सर्व भारताकडे राहील. मात्र, हीच मालिका यूएईमध्ये खेळविल्यास हे सर्व अधिकार पाकिस्तानला मिळतील. याच वृत्तपत्राने आणखी आग ओकताना लिहिले की, भारताच्या या ब्लॅकमेलिंगला रोखण्यासाठी पाक सरकार आणि पीसीबी अध्यक्ष चांगले प्रयत्न करीत आहेत.(वृत्तसंस्था)