शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच : गांगुली

By admin | Updated: July 29, 2015 02:29 IST

सीमेपलिकडून सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे माजी कर्णधार सौरव गांगुली याने समर्थन केले आहे.

नवी दिल्ली : सीमेपलिकडून सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे माजी कर्णधार सौरव गांगुली याने समर्थन केले आहे.गांगुली म्हणाला की, बीसीसीआयचे मत बरोबर आहे. जो पर्यंत दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांत क्रिकेट खेळवण्यात येउ नये. दोन्ही देशांत क्रिकेट सुरू होण्याआधी दहशतवाद थांबावा. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान होणारी मालिका ही नेहमीच मनोरंजक आणि रोमांचक असते, मात्र त्यामुळे दहशतवादामुळे पीडित झालेल्या लोकांचे दु:ख दूर होत नाही.गांगुली म्हणाला की, आता बराच वेळ झाला आहे. आम्ही २००४ मध्ये पाकिस्तानात वन डे क्रिकेट खेळलो होतो. तेव्हा संघाचा कर्णधार होतो. ही मालिकाही १५ वर्षांनंतर खेळली गेली होती. स्पॉट फिक्सींगच्या आरोपांतून मुक्त केलेला क्रिकेटपटू एस.श्रीसंत याला बीसीसीआयकडूनही बंदी उठवली जाईल, अशी आशाही गांगुली याने व्यक्त केली. गांगुली म्हणाला की, दिल्ली न्यायालयाने आरोपांतून श्रीसंतला मुक्त केले आहे. तसेच बीसीसीआयने म्हटले की, दंडात्मक कारवाई मात्र सुरूच राहील. मात्र बोर्ड आणि श्रीसंत यांच्यात याबाबत नक्कीच चर्चा होईल, असेही गांगुली म्हणाला. सचिन तेंडुलकर व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण सोबत बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीत सदस्य असलेला गांगुली भारतीय क्रिकेटमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांवर खूश आहे.