शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

भारत-आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघांत आज लढत

By admin | Updated: July 29, 2015 02:36 IST

भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघादरम्यान उद्या, बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सराव कसोटी सामन्यात सर्वांची नजर कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर राहणार आहे,

चेन्नई : भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघादरम्यान उद्या, बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सराव कसोटी सामन्यात सर्वांची नजर कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर राहणार आहे, तर यजमान संघ पहिली लढत अनिर्णीत संपल्यानंतर या लढतीत विजय मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.श्रीलंका दौऱ्यापूर्वी सामन्याचा सराव करावा, या उद्देशाने कोहलीने या लढतीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोमवारी कसून सरावही केला. भारतीय संघ १२ आॅगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका आणि चेन्नईतील वातावरणामध्ये बरेच साम्य आहे.गेल्या आठवड्यात खेळल्या गेलेला पहिला अनधिकृत कसोटी सामना अनिर्णीत संपला होता. एम.ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी संथ व टणक असल्यामुळे निकाल शक्य झाला नाही. भारत ‘अ’ संघाला उद्यापासून खेळल्या जाणाऱ्या लढतीत चमकदार कामगिरीची आशा आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरेल, अशी आशा आहे. उभय संघाच्या कर्णधारांनी पहिल्या लढतीसाठी असलेली खेळपट्टी फलंदाजांसाठी कठिण व फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याचे म्हटले होते. गेल्या तीन दिवसांपासून मैदानातील कर्मचारी खेळपट्टीवर मेहनत घेत आहेत. पहिल्या लढतीत भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझा आणि अमित मिश्रा यांनी अनुक्रमे सहा व पाच बळी घेतले होते. सलामीवीर लोकेश राहुलने पहिल्या डावात ९६ धावा फटकावल्या होत्या. कर्णधार चेतेश्वर पुजारा, विजय शंकर अणि श्रेयस अय्यर यांचेही योगदान उपयुक्त ठरले होते. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलिया संघाची भिस्त वेगवान गोलंदाजांसह पहिल्या लढतीत ८ बळी घेणारा फिरकीपटू स्टिफन ओकिफेच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कागदावर राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा भारत ‘अ’ संघ मजबूत भासत आहे. अनुभवी व युवा खेळाडूंच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधल्या गेला आहे.आॅस्ट्रेलियाची गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची बाजू दमदार आहे. त्यामुळे भारतीय संघाला या लढतीत विजय मिळविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. पहिल्या लढतीत पहिल्या डावात आॅस्ट्रेलियाने तीन विकेट झटपट गमावल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार उस्मान ख्वाजाने वेगवान गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. खाद्यांच्या दुखापतीतून सावरलेला फिरकीपटू एश्टोन एगर या लढतीत निवडसाठी उपलब्ध राहिल. (वृत्तसंस्था)