शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भारत अ १३५ धावांत गारद

By admin | Updated: July 30, 2015 01:24 IST

श्रीलंका दौऱ्याआधी सराव व्हावा, या उद्देशाने आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळणारा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली फ्लॉप ठरला.

चेन्नई : श्रीलंका दौऱ्याआधी सराव व्हावा, या उद्देशाने आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळणारा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली फ्लॉप ठरला. त्याचबरोबर त्याचा राष्ट्रीय संघातील सहकारी चेतेश्वर पुजारादेखील स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय अ संघावर फक्त १३५ धावांत गारद होण्याची नामुष्की ओढवली.प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलिया अ संघाने सावध सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर १३ षटकांत बिनबाद ४३ धावा केल्या. आता ते भारत अ संघापासून ९२ धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला, तेव्हा कॅमरन बॅनक्राक्ट २४ व कर्णधार उस्मान ख्वाजा १३ धावांवर खेळत होते.माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे दोन्ही संघ या सामन्यात आपल्या बाहूवर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. या दोन्ही संघांनी एम. ए. चिंदबरम स्टेडियम येथे सामना सुरू होण्याआधी मौन ठेवून कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. भारत अ संघाचा कर्णधार पुजाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय आॅस्ट्रेलियाच्या वेगवान व फिरकी असे मिश्रण असलेल्या गोलंदाजी आक्रमणाने चुकीचा ठरवला. भारतीय फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतातर्फे करुण नायरने सर्वाधिक ५० धावा केल्या. भारत अने त्यांचे अखेरचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत गमावले.आॅस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज गुरिंदर संधू सर्वांत यशस्वी ठरला. त्याने २५ धावांत ३ गडी बाद केले. मध्यमगती गोलंदाज अँड्र्यू फेकेटे (३३ धावांत २) आणि फिरकी गोलंदाज एस्टन एगर (२३ धावांत २ बळी) व स्टीव्ह ओकीफी (३० धावांत २ बळी) यांनी त्याला चांगली साथ दिली.भारतीय कसोटी संघाच्या अंतिम ११ जणांत स्थान पक्के करण्यासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार असणाऱ्या पुजाराने (११) डावाची सुरुवात केली; परंतु सलामीवीर म्हणून त्याला यश मिळाले नाही. त्याला मध्यमगती गोलंदाज मार्कस् स्टोनिस याने त्रिफळाबाद करून आॅस्ट्रेलिया अला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीवर बराच काळ घालवल्यानंतरही मुकुंदला ४९ चेंडूंत फक्त १५ धावा करता आल्या. त्यात २ चौकारांचा समावेश होता. ओकीफीने पुढील षटकात श्रेय अय्यर (१) याला बाद करून भारताची स्थिती ४ बाद ५३ अशी केली.नायर आणि नमन ओझा यांनी पडझड थांबवताना पाचव्या गड्यासाठी जवळपास ३३ षटकांत ५६ धावांची भागीदारी केली. या दोघांत विशेषत: नमनला धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एक वेळ त्याने ७० चेंडूंत फक्त ३ धावाच केल्या होत्या. नमनवर वेगाने धावा काढण्याचा दबाव वाढला आणि अशातच एगरला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. वेडने त्याला यष्टिचीत करण्यात कोणतीही चूक केली नाही. नमनने १० धावा केल्या; परंतु त्यासाठी त्याला ८४ चेंडूंचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्याचे तळातील फलंदाज पुढील ११ षटकांत तंबूत परतले. नायरने अर्धशतक केल्यानंतर फेकेटे याच्या गोलंदाजीवर झेल देऊन बसला. त्याने त्याच्या डावात १५३ चेंडूंचा सामना केला आणि ५ चौकार मारले. संधूने भारताची तळातील फळी तंबूत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने बाबा अपराजित (१२) आणि वरुण अ‍ॅरोन (०) यांना एकाच षटकात बाद केले. त्यानंतर प्रज्ञान ओझा (०) याला त्रिफळाबाद करून भारतीय संघाच्या डावाला पूर्णविराम दिला.(वृत्तसंस्था)लक्ष कोहलीवर...कोहलीला या सामन्यात बीसीसीआयने खेळण्याचा विशेष आग्रह केला होता. श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला सरावाची संधी मिळावी, हा उद्देश त्यामागे होता. कोहलीने सुरुवातीला गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आणि प्रारंभी एक चौकार व षटकारही मारला; परंतु दुसऱ्या बाजूने सलामीवीर अभिनव मुकुंद बाद झाल्याने कोहली एकदम सावध होऊन खेळू लागला. मुकुंदने ओकीफीच्या चेंडूवर यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल सोपवला. कोहलीला गोलंदाजी करण्यासाठी आतुर असलेल्या एगरने अखेर भारतीय कसोटी कर्णधाराला पायचीत करण्यात यश मिळविले. कोहलीने १६ धावांसाठी ४२ चेंडूंचा सामना केला.