शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

खराब षटकांमुळे सामना गमावला : धोनी

By admin | Updated: October 4, 2015 04:10 IST

द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली.

धर्मशाळा : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली. या षटकांत अनेक चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याचे धोनीचे मत आहे.‘‘भारताने १९९ धावा केल्या, पण गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. पाहुण्यांनी दोन चेंडू शिल्लक राखून सात गड्यांनी सामना जिंकला. सामनावीर ठरलेल्या जेपी ड्युमिनी याने अक्षर पटेलच्या १६ व्या षटकात तीन षटकार खेचून २२ धावा वसूल केल्या. एखाद्या गोलंदाजाची एका षटकात धुलाई झाली तरी त्याने ठोस चेंडू टाकून जरब बसवायला हवी, पण असे घडू शकले नाही. हा फलंदाजांचा सामना वाटत होता. एखाद्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर पुढचा चेंडू तुम्ही सावध टाकायला हवा. एका षटकात तीन षटकार किंवा चौकार लागणार असतील तर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी गोलंदाजांवर वर्चस्व मिळविले म्हणून समजाच. आम्हाला दोन-तीन खराब षटकांचा फटका बसला.’’खेळात अनेक टप्पे येतात, असे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आम्ही दोन वेळा चार-चार चेंडूंवर भरपूर धावा दिल्या, पण तरीही दडपण आणले. माझ्या मते चांगल्या खेळपट्टीवर २०० धावांचा बचावदेखील गोलंदाजांना कठीण होऊन बसतो. प्रतिस्पर्धी फलंदाज धावा काढण्याच्या तयारीतच असतात.’’एका षटकात १४-१५ धावा मोजाव्या लागल्यास फलंदाजांवर वर्चस्व गाजविताच येत नसल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आश्विन आणि पटेल यांची अंतिम ११ मध्ये केलेली निवड योग्य होती. दवबिंदूंमुळे फिरकी गोलंदाजांना त्रास झाला हे खरे आहे. अक्षरच्या एका खराब षटकाचा अपवाद वगळता त्याने सुरेख मारा केला. टी-२० त धावा निघतातच, पण अक्षरच्या चेंडूची दिशा आणि टप्पा अचूक होता.’’ (वृत्तसंस्था)