शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

खराब षटकांमुळे सामना गमावला : धोनी

By admin | Updated: October 4, 2015 04:10 IST

द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली.

धर्मशाळा : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली. या षटकांत अनेक चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याचे धोनीचे मत आहे.‘‘भारताने १९९ धावा केल्या, पण गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. पाहुण्यांनी दोन चेंडू शिल्लक राखून सात गड्यांनी सामना जिंकला. सामनावीर ठरलेल्या जेपी ड्युमिनी याने अक्षर पटेलच्या १६ व्या षटकात तीन षटकार खेचून २२ धावा वसूल केल्या. एखाद्या गोलंदाजाची एका षटकात धुलाई झाली तरी त्याने ठोस चेंडू टाकून जरब बसवायला हवी, पण असे घडू शकले नाही. हा फलंदाजांचा सामना वाटत होता. एखाद्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर पुढचा चेंडू तुम्ही सावध टाकायला हवा. एका षटकात तीन षटकार किंवा चौकार लागणार असतील तर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी गोलंदाजांवर वर्चस्व मिळविले म्हणून समजाच. आम्हाला दोन-तीन खराब षटकांचा फटका बसला.’’खेळात अनेक टप्पे येतात, असे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आम्ही दोन वेळा चार-चार चेंडूंवर भरपूर धावा दिल्या, पण तरीही दडपण आणले. माझ्या मते चांगल्या खेळपट्टीवर २०० धावांचा बचावदेखील गोलंदाजांना कठीण होऊन बसतो. प्रतिस्पर्धी फलंदाज धावा काढण्याच्या तयारीतच असतात.’’एका षटकात १४-१५ धावा मोजाव्या लागल्यास फलंदाजांवर वर्चस्व गाजविताच येत नसल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आश्विन आणि पटेल यांची अंतिम ११ मध्ये केलेली निवड योग्य होती. दवबिंदूंमुळे फिरकी गोलंदाजांना त्रास झाला हे खरे आहे. अक्षरच्या एका खराब षटकाचा अपवाद वगळता त्याने सुरेख मारा केला. टी-२० त धावा निघतातच, पण अक्षरच्या चेंडूची दिशा आणि टप्पा अचूक होता.’’ (वृत्तसंस्था)