शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

खराब षटकांमुळे सामना गमावला : धोनी

By admin | Updated: October 4, 2015 04:10 IST

द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली.

धर्मशाळा : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली. या षटकांत अनेक चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याचे धोनीचे मत आहे.‘‘भारताने १९९ धावा केल्या, पण गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. पाहुण्यांनी दोन चेंडू शिल्लक राखून सात गड्यांनी सामना जिंकला. सामनावीर ठरलेल्या जेपी ड्युमिनी याने अक्षर पटेलच्या १६ व्या षटकात तीन षटकार खेचून २२ धावा वसूल केल्या. एखाद्या गोलंदाजाची एका षटकात धुलाई झाली तरी त्याने ठोस चेंडू टाकून जरब बसवायला हवी, पण असे घडू शकले नाही. हा फलंदाजांचा सामना वाटत होता. एखाद्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर पुढचा चेंडू तुम्ही सावध टाकायला हवा. एका षटकात तीन षटकार किंवा चौकार लागणार असतील तर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी गोलंदाजांवर वर्चस्व मिळविले म्हणून समजाच. आम्हाला दोन-तीन खराब षटकांचा फटका बसला.’’खेळात अनेक टप्पे येतात, असे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आम्ही दोन वेळा चार-चार चेंडूंवर भरपूर धावा दिल्या, पण तरीही दडपण आणले. माझ्या मते चांगल्या खेळपट्टीवर २०० धावांचा बचावदेखील गोलंदाजांना कठीण होऊन बसतो. प्रतिस्पर्धी फलंदाज धावा काढण्याच्या तयारीतच असतात.’’एका षटकात १४-१५ धावा मोजाव्या लागल्यास फलंदाजांवर वर्चस्व गाजविताच येत नसल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आश्विन आणि पटेल यांची अंतिम ११ मध्ये केलेली निवड योग्य होती. दवबिंदूंमुळे फिरकी गोलंदाजांना त्रास झाला हे खरे आहे. अक्षरच्या एका खराब षटकाचा अपवाद वगळता त्याने सुरेख मारा केला. टी-२० त धावा निघतातच, पण अक्षरच्या चेंडूची दिशा आणि टप्पा अचूक होता.’’ (वृत्तसंस्था)