शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

२९ साल बाद...

By admin | Updated: November 4, 2016 04:10 IST

भारत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार

नवी दिल्ली : भारत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार आहे. भारताने यापूर्वी १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २९ वर्षांनी इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. इंग्लंड संघ बांगलादेशचा दौरा आटोपून भारतात डेरेदाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान यापूर्वी इंग्लंडच्या यजमानपदाखाली २०१४ मध्ये मालिका खेळली होती. त्या वेळी इंग्लंडने ३-१ ने विजय मिळवला होता. भारतीय संघ यापूर्वी पाच मालिकेत अपराजित असून, या वेळी इंग्लंडविरुद्ध पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे. भारताला २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले होते. भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात २-१, दक्षिण आफ्रिकेला २०१५-१६ मध्ये भारतात ३-० ने, वेस्ट इंडीजला २०१६ मध्ये २-० ने आणि अलीकडेच न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले आहे. इंग्लंडने १९३३-३४ मध्ये भारताचा प्रथमच दौरा केला होता. त्या वेळी इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती. भारत प्रथमच पाच सामन्यांची मालिका १९४७-४८ मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. भारतात १९४८-४९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथमच पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने २० वेळा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. या कालावधीत भारताने पाच अशा मालिकांचे आयोजन केलेले आहे की त्यात सहा-सहा कसोटी सामन्यांचा समावेश होता. गेल्या २९ वर्षांत भारताने दोन, तीन किंवा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध आपल्या यजमानपदाखाली खेळलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील १९५१-५२ ची मालिका १-१ ने बरोबरीत सोडविली, तर १९६१-६२ च्या मालिकेत २-० ने, तर ७२-७३ च्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला. भारताने १९७६-७७ ची मालिका १-३ ने गमावली, तर १९८१-८२ ची मालिका १-० ने जिंकली. भारताला १९८५-८६ च्या मालिकेत १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान आपल्या कसोटी इतिहासातील ९०० वा सामना पूर्ण करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध ११२ कसोटी सामन्यांत २१ विजय मिळविता आले, तर ४३ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४८ सामने अनिर्णीत संपले. (वृत्तसंस्था)भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १९४८-४९ मध्ये वेस्ट इंडीज, १९५१-५२ मध्ये इंग्लंड, १९५२-५३ मध्ये पाकिस्तान, १९५५-५६ मध्ये न्यूझीलंड, १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडीज, १९५९-६० मध्ये आॅस्ट्रेलिया, १९६०-६१ मध्ये पाकिस्तान, १९६१-६२ मध्ये इंग्लंड, १९६३-६४ मध्ये इंग्लंड, १९६९-७० मध्ये आॅस्ट्रेलिया, १९७२-७३ मध्ये इंग्लंड, १९७४-७५ मध्ये वेस्ट इंडीज आणि १९७६-७७ मध्ये इंग्लंड यांचे यजमानपद भूषविले आहे. त्यानंतर भारताने १९७८-७९ वेस्ट इंडीज, १९७९-८० मध्ये आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान, १९८१-८२ मध्ये इंग्लंड व १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडीज या संघांविरुद्ध प्रत्येकी सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. भारताने १९८४-८५ मध्ये इंग्लंड आणि १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे.