शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बंदीची शिक्षा रद्द करा

By admin | Updated: July 29, 2015 02:38 IST

वेगवान गोलंदाज शांताकुमार श्रीसंतला पुनरागमनची आशा आहे. श्रीसंत स्वत:वर असलेली बंदी रद्द करण्यासाठी बीसीसीआयसोबत संपर्क साधणार आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने

कोची : वेगवान गोलंदाज शांताकुमार श्रीसंतला पुनरागमनची आशा आहे. श्रीसंत स्वत:वर असलेली बंदी रद्द करण्यासाठी बीसीसीआयसोबत संपर्क साधणार आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने गेल्या आठवड्यात २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला.श्रीसंत म्हणाला, ‘मी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी विनंती करू शकतो, असे म्हटले होते. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतामुळे मला आशेचा किरण दिसत आहे. ते माझ्या विनंतीचा विचार करतील अशी आशा आहे. त्यामुळे मी विनंती अर्ज पाठविण्यास उत्सुक आहे. मी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे. बीसीसीआयच्या यानंतच्या बैठकीत माझ्याबाबत अनुकूल निर्णय होईल, अशी आशा आहे.’भारतातर्फे कसोटी व वन-डे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीसंतने आपल्या वेदनांना मोकळी वाट करून दिली. मला अटक करण्यात आली व तिहारा तुरुंगात नेण्यात आल्यानंतर कथित प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिम व त्याचा सहकारी छोटा शकिल यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटसोबत संबध असल्याचे आरोप करण्यात आले. त्यावेळी मी आत्महत्या करण्याचा विचार करीत होता. ईश्वरावर असलेल्या श्रद्धेमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे मला यातून सावरण्यास मदत मिळाली, असेही श्रीसंत म्हणालाबीसीसीआयकडून अनुकूल निर्णयाची आशा असल्याचे श्रीसंतने एका उत्तरात सांगितले. श्रीसंत पुढे म्हणाला, ‘माझ्या मार्गात कुठली अडचण असेल असे वाटत नाही. बीसीसीआय एक संस्था आहे, व्यक्ती नाही. बीसीसीआयने जर बंदी हटवली नाही तर न्यायालयाचे दार ठोठावेल. मी कुणाला आव्हान देत नसून प्रतीक्षा करणार आहे. मी क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहो.’जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सोमवारी सराव केल्याचे वृत्त श्रीसंतने फेटाळून लावले. आजीवन बंदीचा निर्णय रद्द झाल्यानंतरच या मैदानावर सराव करणार असल्याचे श्रीसंतने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मनात आत्महत्येचे विचार घोळत होते : श्रीसंतस्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यावर सुरूवातीच्या काळात आत्महत्येचे विचार येत होते. मात्र भगवान शंकरावरील श्रद्धा आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच यातून बाहेर आलो, असे क्रिकेटपटू श्रीसंत याने सांगितले.श्रीसंत जेव्हा तिहार तुरूंगात बंद होता. त्यावेळी त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. मात्र आता श्रीसंतला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची आशा आहे. त्यासाठी आपण बीसीसीआयशी संपर्क करू, असेही श्रीसंत म्हणाला.श्रीसंत म्हणाला की, मी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकुर यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हटले होते की, बंदी हटवण्यासाठी मी आग्रह करू शकतो. आता ठाकुर यांच्या उत्तराची वाट बघतोय. मला अपेक्षा आहे की, बीसीसीआय अपेक्षेप्रमाणेच निर्णय घेईल. भारताकडून टेस्ट आणि वन डे या दोन्ही प्रकारांत क्रिकेट खेळणारा श्रीसंतने आरोप झाल्यानंतरच्या काळात भोगाव्या लागलेल्या यातनाबाबतही सांगितले. त्यावेळी श्रीसंतला तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. आणि त्याच्यावर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजीच्या रॅकेटशी जोडले जाण्याचे आरोप लावण्यात आले होते.