शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

उल्हासनगरात पाणीबाणी

By admin | Updated: May 10, 2016 02:03 IST

विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे.

उल्हासनगर : विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे. त्यामुळे शहरात नव्याने आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको होण्याची भीती आहे. शहराच्या पूर्व भागात उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावण्यात आला आहे. त्यानंतरही कॅम्प नंबर-४ च्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून टंचाई कायमच आहे.उल्हासनगरला एमआयडीसीकडून दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पालिकेने पाणीपुरवठ्यातील सुसूत्रतेसाठी विभागवार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले. मात्र, कमी दाबाच्या आणि असमान पुरवठ्यामुळे टंचाई वाढते आहे. पूर्व भागाला पाले गावावरील मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याचा दाब वाढावा म्हणून आयुक्त मनोहर हिरे यांनी व्हॉल्व्ह बसवला आहे. मात्र, त्याचा फायदा पूर्वेला न होता फक्त कॅम्प नंबर-५ ला होतो आहे.४ नंबरला चांगल्या दाबाने पुरवठा होण्यासाठी आयुक्त मनोहर हिरे यांच्यासोबत सभागृह नेते धनंजय बोडारे, स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे, नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी चर्चा केली. कॅम्प नंबर-४ च्या परिसरातील जलवाहिनीत गळती असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांचे विशेष पथक जलवाहिन्यांची चाचणी घेत असून गळतीचा शोध घेत आहे. कॅम्प नंबर-४ च्या परिसरातील संभाजी चौक, राहुलनगर, दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, सुभाष टेकडी, भारतनगर, नागसेननगर, समतानगर, लालचक्की, भीमनगर, ओटी सेक्शन, संतोषनगर, सिद्धार्थनगर आदी परिसरांत पाणीटंचाई कायम आहे.नगरसेवक विजय तायडे, राजेश वानखडे, नगरसेविका अंजली साळवे, शैलजा सोनताटे, मंदा सोनकांबळे, जयश्री कांबळी, रमेश चव्हाण, सुरेश जाधव, अनिता भानुशाली यांनीही पाणीटंचाईबाबत नाराजी व्यक्त करून पुन्हा आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको आंदोलने करायची का, असा प्रश्न विचारला आहे. >ठाण्यात आज पाणी नाही, मुंब्रा-कळव्यालाही फटका स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतू पार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी आदी परिसरांत पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तर, बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी ४० टक्के पाणीकपात करण्याचे कळवले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असून या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ या परिसराचा (एमआयडीसीकडून होणारा) पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे.