शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

उल्हासनगरात पाणीबाणी

By admin | Updated: May 10, 2016 02:03 IST

विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे.

उल्हासनगर : विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे. त्यामुळे शहरात नव्याने आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको होण्याची भीती आहे. शहराच्या पूर्व भागात उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावण्यात आला आहे. त्यानंतरही कॅम्प नंबर-४ च्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून टंचाई कायमच आहे.उल्हासनगरला एमआयडीसीकडून दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पालिकेने पाणीपुरवठ्यातील सुसूत्रतेसाठी विभागवार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले. मात्र, कमी दाबाच्या आणि असमान पुरवठ्यामुळे टंचाई वाढते आहे. पूर्व भागाला पाले गावावरील मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याचा दाब वाढावा म्हणून आयुक्त मनोहर हिरे यांनी व्हॉल्व्ह बसवला आहे. मात्र, त्याचा फायदा पूर्वेला न होता फक्त कॅम्प नंबर-५ ला होतो आहे.४ नंबरला चांगल्या दाबाने पुरवठा होण्यासाठी आयुक्त मनोहर हिरे यांच्यासोबत सभागृह नेते धनंजय बोडारे, स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे, नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी चर्चा केली. कॅम्प नंबर-४ च्या परिसरातील जलवाहिनीत गळती असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांचे विशेष पथक जलवाहिन्यांची चाचणी घेत असून गळतीचा शोध घेत आहे. कॅम्प नंबर-४ च्या परिसरातील संभाजी चौक, राहुलनगर, दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, सुभाष टेकडी, भारतनगर, नागसेननगर, समतानगर, लालचक्की, भीमनगर, ओटी सेक्शन, संतोषनगर, सिद्धार्थनगर आदी परिसरांत पाणीटंचाई कायम आहे.नगरसेवक विजय तायडे, राजेश वानखडे, नगरसेविका अंजली साळवे, शैलजा सोनताटे, मंदा सोनकांबळे, जयश्री कांबळी, रमेश चव्हाण, सुरेश जाधव, अनिता भानुशाली यांनीही पाणीटंचाईबाबत नाराजी व्यक्त करून पुन्हा आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको आंदोलने करायची का, असा प्रश्न विचारला आहे. >ठाण्यात आज पाणी नाही, मुंब्रा-कळव्यालाही फटका स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतू पार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी आदी परिसरांत पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तर, बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी ४० टक्के पाणीकपात करण्याचे कळवले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असून या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ या परिसराचा (एमआयडीसीकडून होणारा) पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे.