शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला

By admin | Updated: May 22, 2016 02:18 IST

पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे घणसोलीतील रहिवाशी सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे. प्रशासनाकडून पुरवठा होवुनही सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या भरत

नवी मुंबई : पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे घणसोलीतील रहिवाशी सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे. प्रशासनाकडून पुरवठा होवुनही सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या भरत नसल्यामुळे अनेक सोसायट्यांना दोन दिवसातुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. परिणामी सोसायटींच्या बैठकांमध्ये पाणी चर्चेचा विषय बनला आहे.शहराला पाणी पुरवठा करणारया मोरबे धरणातच पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाने पाण्याच्या वापरावर नियंत्रण आनले आहे. पाण्याचा अपव्यय टाळुन उपलब्ध पाणीसाठ्यातुन नागरिकांची तहान भागवण्याचे पुरेपूर प्रयत्न महापालिकेकडून होत आहेत. यामुळे अनेक विभागांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यात प्रशासनाने कपात देखील केलेली आहे. पावसाळा सुरु होऊन मोरबे धरणात पुरेसे पाणी उपलब्ध होईपर्यंत महापालिका क्षेत्रात हीच परिस्थती कायम राहणार आहे. परिणामी गरजेपुरताही पाणी पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे घणसोली परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. घणसोली कॉलनी परिसराला प्रशासनाकडून दुपारी सुमारे चार ते पाच तास पाणी पुरवठा होतो. यावेळी परिसरातील सोसायट्यांकडून भुमीगत टाक्यांमध्ये हे पाणी साठवुन नियोजीत वेळेप्रमाणे सकाळी रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र घणसोली परिसरातील अनेक रहिवाशी सोसायट्यांमध्ये १०० पेक्षा जास्त घरे असून त्यापैकी सिडको निर्मित सिम्पलेक्स वसाहतींमध्ये सुमारे १ हजार घरांच्या सोसायट्या आहेत. अशा सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. एक ते दीड महिन्यांपासून सुरु असलेली ही परिस्थिती मागील दहा दिवसांपासुन अधिकच बिकट झाली आहे. प्रशासनाकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिम्पलेक्स, घरोंदा येथील मोठ्या सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्याच पुर्णपणे भरत नाहीत. तर पाण्याच्या टाक्याच भरत नसल्यामुळे रहिवाशांना दोन दिवसातून एकदा पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी अवघे ५ ते १० मिनिटे राहत असल्यामुळे गृहिणींची तारांबळ उडत आहे. तर काहींना घरगुती वापरासाठी पाण्याच्या शोधात घराबाहेर निघावे लागत आहे.एक-दोन दिवस पाणीच मिळत नसल्यामुळे संतापलेल्या गृहिणी सोसायटी पदाधीकारयांना जाब विचारत आहेत. त्यांच्यात शाब्दीक खटके उडून सोसायट्यांच्या बैठकांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. परंतु प्रशासनाकडून परिसराला पुरेसा पाणी पुरवठा होत असून, ज्या सोसायटयांच्या भुमीगत वाहीण्यांमध्ये अडचण असेल त्यांनाच पाण्याची समस्या भेडसावत असल्याची शक्यता विभाग अधिकारी अजय गडदे यांनी सांगितले.