शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरा देवास प्रयोग

By admin | Updated: May 22, 2016 01:19 IST

रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मध्यप्रदेशातील देवास या शहरातील नागरीकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी फिल्टरपध्दत स्वीकारली ती कमी खर्चाची आणि दिर्घकालीन उपयोगाची आहे.

राहुल वाडेकर, विक्रमगड/तलवाडारेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मध्यप्रदेशातील देवास या शहरातील नागरीकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी फिल्टरपध्दत स्वीकारली ती कमी खर्चाची आणि दिर्घकालीन उपयोगाची आहे. ही फिल्टर पध्दत काय आहे? पावसाळयात छतावर पडणारे पावसाचे पाणी सध्या पाईपच्या माध्यमातून आपल्या घरच्या अंगणात किंवा अंगणाबाहेर असलेल्या विंधन विहिरीमध्ये सोडण्यात येते. हे विंधन विहिरीत सोडलेले पाणी विहिरीतून भूगर्भात खोलवर जाते व भूगर्भातील रिकाम्या झालेल्या पाणीसाठ्याच्या पोकळीमध्ये प्रवेश करते. परिणामी भूजल पातळीत वाढ होऊन विंधन विहिरींचे पाणी भरपूर वाढते. (वार्ताहर)>६ इंच जाडीचा व ४ फूट लांबीचा पाईप घ्यावा, त्यात वाळूचे तीन सारखे थर जाळी टाकून निर्माण करावेत. छतावरील पावसाचे पाणी ज्या मार्गानी येते, त्या बाजूस ६ मी. मी. आकाराची बारीक वाळू ठेवावी. त्यानंतर जाळी, त्यापुढे १२ मीमी. आकाराच्या वाळूतील गोट्यांचा थर द्यावा त्यापुढे जाळी लावावी त्यानंतरच वाळूतील मध्यम आकारापेक्षा मोठया गोटयांचा ३० मीमीचा थर द्यावा. त्यापुढे जाळी टाकून या पाईपव्दारे हे पाणी विंधन विहिरीत सोडले जाते. पावसाळयापूर्वी छत झाकून साफ करावे. पहिल्या व दुसऱ्या पावसाचे पाणी सिस्टिममध्ये असलेल्या आउटलेटव्दारे जमीनीवर सोडावे. विंधन विहिरीत जाऊ देऊ नये. विंधन विहिरीकडील झडप किंवा कापसाचा बोळा ठेवून हा फिल्टर धुता येतो. धुतलेले पाणी छताकडील टी मधून बाहेर काढावे विंधन विहिरीमधील पाणी शुध्द करण्यासाठी सोडीयम क्लोराईट वा अन्य निर्जंतुके विंधन विहीरीजवळील टी मधून टाकता येतात. अशा प्रकारे छतावरील पाण्याच्यापावसाचे पुनर्भरण केल्यास शहरातील पाणीटंचाईवर थोडयाफार प्रमाणात मात केली जाऊ शकते. पावसाळयाच्या आधीपासूनच हा प्रयोग करण्याची तयारी करता येते. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल खोल जात आहे. पावसाचे प्रमाण जरी कमी झालेले नसले तरीही पाण्याचा वापर मोठया प्रमाणावर होत आहे. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तिच्यावर व भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे ही येणाऱ्या भविष्य काळासाठी आवश्यक बाब बनली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याच्या वापराबाबत, बचतीबाबत व पुर्नभरणाबाबत अत्यंत जागरुक राहण्याची गरजनिर्माण झाली आहे. पावसाचे पाणी, नदीचे, ओढयांचे पाणी साठविणे, त्याचे पुनर्भरण करणे याशिवाय पर्याय नाही. आंघोळीचे पाणी, कपडे धुण्याचे पाणी, भांडे धुण्याचे पाणी साठवून ते जमिनीत जिरविणे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे ही आजची व भविष्यकाळाची गरज बनली आहे.