शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

भात भिजल्याने व्यापारी नाखूष

By admin | Updated: December 10, 2015 01:48 IST

ऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे

संजय कांबळे,  बिर्लागेटऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तर याचा परीणाम म्हणून यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण तालुक्यात ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. सह्याद्री, कर्जत, रत्ना, सुवर्णा, पनवेल, जया, आरपी आदी भाताच्या जातीची लागवड यंदा केली होती. आवटी, मांजर्ली, घोटसई, म्हसकळ, फळेगाव, उशीद, गेरसे, कोसले, वेहळे, पोई, दहागाव, बापसई, रायते, मानिवली, चोरे, रोहन आदी गावात मोठ्या प्रमाणात भात लागवड करण्यात आली. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने बियाणे, खते यांचे वाटप केले. यामुळे यावर्षी पिक चांगले आले. मात्र ऐन कापणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे कापलेले भात शेतातच भिजले. ३ ते ४ दिवस ते पाण्यात राहिल्याने त्याला कोंब येवू लागले. यातूनही शेतकऱ्यांनी कसेबसे भाताचे पेंढे बाहेर काढले व तोडणी केली.मात्र अतिवृष्टीने भिजलेले भात भरडाई करताना त्यातून अखंड तांदूळ मिळत नाही. तसेच भिजलेल्या भातापासून निघालेला तांदूळ लालसर रंगाचा होत असल्याने त्याला बाजारात गिऱ्हाईक पसंत करीत नाही. शिवाय जास्त भिजलेले भात हातात धरताच त्याचे पिठ होते. या भिजलेल्या भाताला छापलेले भात असे म्हटले जाते. प्रामुख्याने देशात सर्वात जास्त तांदूळ पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यात उत्पादीत होतो. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तांदळाची नवीन आवक सुरु होते. त्यापूर्वी कृषी विभागामार्फत अंदाज व्यक्त केला जातो. जून महिन्यापासून १५ सप्टेंबर पर्यंत देशात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट होईल, असे कृषी विभागाला वाटते.