शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटावसाठी सव्वा दहा कोटी खर्च

By admin | Updated: September 5, 2015 03:13 IST

ठाणे, उल्हासनगरप्रमाणे नवी मुंबईमध्येही अनधिकृत बांधकामांची संख्या वाढू लागली आहे. शहरात तब्बल २९३४४ अनधिकृत बांधकामे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईठाणे, उल्हासनगरप्रमाणे नवी मुंबईमध्येही अनधिकृत बांधकामांची संख्या वाढू लागली आहे. शहरात तब्बल २९३४४ अनधिकृत बांधकामे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने सर्वांना नोटीस दिली आहे. आतापर्यंत फक्त ५५२९ बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, त्यासाठी १० कोटी २५ लाख रुपये खर्च आला आहे. सुनियोजित शहर ही नवी मुंबईची ओळख आता पुसली जाऊ लागली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक अतिक्रमण होत आहे. संबंधित दोन्ही प्रशासनाला बेकायदेशीर बांधकाम रोखण्यात अपयश आले आहे. पालिकेने २००० मध्ये केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे शहरात ४८ झोपडपट्या असून त्यामध्ये ४१ हजार ९५६ नागरिक रहात आहेत. परंतु पंधरा वर्षामध्ये झोपड्यांची संख्या प्रचंड वाढली असून आता ६० हजार पेक्षा जास्त नागरिक झोपडपट्टी परिसरात रहात आहेत. भुमाफीया शासकिय जमीनीवर अतिक्रमण करून चाळी बांधत असून त्या सर्वसामान्य नागरिकांना विकत आहेत. गावठाण परिसरात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडको व महापालिका कारवाई करत आहे. परंतू इतरांनी केलेल्या अतिक्रमणांवर मात्र दुर्लक्ष केले जात आहे. चार मजली इमारत बांधेपर्यंत प्रशासन काहीच करत नाही. परंतू इमारत बांधून तेथील घरे सामान्य नागरिकांनी विकत घेतल्यानंतर त्यावर कारवाई केली जात आहे. सिडकोने विकसीत केलेल्या नोडमध्येही मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे दुकानांवर एक मजला वाढविला आहे. मार्केटमध्ये कामगार, वाहतूूक संघटना या सर्वांनी बेकायदेशीर कार्यालये बांधली आहेत. कोपरखैरणेमधील माथाडी वसाहतीमध्ये बैठ्या चाळीच्या जागेवर तळमजला व वरी दिड मजल्यांची परवानगी असताना बहुतांश नागरिकांनी दोन व काहींनी तिन मजल्यापर्यंत बांधकाम केले आहे. बैठ्या चाळीतील जवळपास ९० घरांना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र नाही. नेरूळ सेक्टर ८ व १० या अल्प उत्पन्न गटातील परिसरातही बैठ्या चाळींच्या जागेवर मंजूरीपेक्षा जास्त वाढीव बांधकाम केले आहे.तिन्ही संस्थांमध्ये समन्वय नाहीशहरात सिडको, एमआयडीसी व महापालिका या तिन शासकिय संस्था आहेत. अतिक्रमण होवू न देण्याची जबाबदारी सर्र्वांचीच आहे. परंतू एखादे बेकायदेशीर बांधकाम सुरू झाले की महापालिका सिडको व एमआयडीसीकडे बोट दाखवून कारवाई टाळत आहे. राजकिय वरदहस्त असला की तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. अनेक वेळा फक्त नोटीस दिली जाते परंतू संबंधीत बांधकाम पाडले जात नाही. तिनही संस्थांमध्ये समन्वय नसल्यामुळेच अतिक्रमणे वाढत आहेत.निवासी जागेचा व्यावसायिक वापरशहरात अनेक निवासी जागेचा व्यवसायीक वापर सुरू आहे. नेरूळ, कोपरखैरणेमध्ये रोडच्या बाजूला असलेल्या बैठ्या चाळींच्या जागेवर दोन व तिन मजल्यांचे बांधकाम केले आहे. तळमजल्यावरील जागा व्यवसायासाठी वापरली जात आहे. अनेकांनी बँक, एटीएम व इतर संस्थांना जागा भाड्याने दिल्या आहेत. यांच्यावर पालिका कारवाई करत नाही. पामबिच व इतर अनेक ठिकाणी धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून त्यांच्यावर कारवाई न करता प्रशासन सामान्य नागरिकांवरच कारवाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. फुकट वापरतात पाणी अनधिकृत बांधकाम करणारांनी महापालिकेची अधिकृत नळजोडणी घेतलेली नाही. अनधिकृतपणे पाण्याचा वापर करण्यात येत आहे. वर्षानुवर्ष फुकट पाणी वापरूनही संबंधीतांवर काहीच कारवाई केली जत नाही. बेकायदेशीरपणे बांधकामांना मालमत्ताकरही लावला जात नसल्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे.