शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

पाण्याबरोबरच रक्ताचाही तुटवडा

By admin | Updated: May 22, 2016 02:14 IST

सद्या राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणीकपात करण्यात आल्याने सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यातच आत रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीसद्या राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणीकपात करण्यात आल्याने सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यातच आत रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. सुटी असल्याने अनेकजण गावी अथवा पर्यटनासाठी जातात. त्यामुळे महाविद्यायले अथवा सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत नाही. एखाद्या संस्थेने शिबिराचे आयोजन केल तरी फारसा प्रतिसाद मिळन नाही. त्यामुळे सध्या पनवेल आणि नवी मुंबई परिसरात रक्तपेढ्या तसेच रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता भासत असून अपेक्षित रक्तगट मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांमधून करण्यात येत आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अनेक दवाखाने असून या ठिकाणी उपचाराची सोय सुविधा आहेत. तेरणा, एमजीएम. डी वाय पाटील, टाटा मेमेरीयल ट्रस्टचे मोठे रुग्णालय असून या ठिकाणी राज्यभरातून रूग्ण उपचाराकरीता येतात. नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, सानपाडा, बेलापूर आणि पनवेल पट्टयात नवीन पनवेल, पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे या ठिकाणी अनेक लहान मोठे रूग्णालय असून येथे रायगड जिल्ह्यासह कोकणातून लोक उपचाराकरीता येतात. किडणी, हृदयरोग यासारख्या विविध आजारांच्या रूग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. त्याचबरोबर शस्त्रक्रिया करतानाही रक्ताची गरज भासते. याशिवाय मलेरिया, डेंग्यु यासारख्या आजार झाले तरी शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात, तेव्हा त्या द्याव्या लागतात. नवी मुंबई, पनवेल परिसरात महिन्याला किमान तीन हजारांपेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्याची मागणी असते. जून ते जानेवारी दरम्यान महाविद्यालय त्याचबरोबर इतर सेवाभावी संस्थांकडून विविध ठिकाणी रक्तदान शिबिर होत असल्याने त्या ठिकाणाहून सहज रक्त उपलब्ध होते. सद्या उन्हाळा असल्याने रक्त साठा कमी झाला आहे. खांदा वसाहतीतील रोटरी क्लब आॅफ नवीन पनवेल चॅँरीटेबल ट्रस्ट संचलीत डाँक्टर बी व्ही लिमये रक्तपेढीत रक्ताची टंचाई जाणवू लागली आहे. त्यांच्याकडे आजच्या घडीला केवळ २५ रक्त पिशव्या आहेत. मागणी त्यापेक्षा किती तरी जास्त आहे. नवी मुंबईतील तेरणा ब्लड बॅकेत इतरवेळी १०० हून अधिक रक्तपिशव्यांचा साठा असतो. मात्र याठिकाणीही रक्ताचा तुटवडा जाणवत असून केवळ २५ पिशव्या रक्त उपलब्ध आहे. तशीच परिस्थिती पनवेल येथील साई ब्लड बँकेची आहे. या ठिकाणी काही रक्तगटातील रक्त शिल्लक नाही. विशेषत: एबी पॉझिटिव्हचा मोठया प्रमाणात तुटवडा भासत आहे. एमजीएम, लाईफलाईन व खारघर येथील नवी मुंबई ब्लड बँकेची परिस्थिती फारशी वेगळी नाही. किडणीचा विकार झालेल्या रूग्णांना डायलिसिस केले जाते त्यांना सातत्याने रक्ताची गरज भासतो. मात्र सध्या रक्त मिळत नसल्याने अशा रुग्णांना इरीथ्रोपोयटीन व आयर्न हे इंजेक्शन दयावी लागत असल्याचे डायलिसेस तंत्रज्ञ मनोज राणे यांनी सांगितले. जून महिन्यापर्यंत ही टंचाई राहणार असून पावसाळयात रक्तसाठा वाढेल, असा विश्वास असे लियमे रक्तपेढीचे सुरेश श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.