शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पाण्याअभावी हाल

By admin | Updated: April 21, 2017 00:26 IST

मागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी

मिलिंद अष्टिवकर,  रोहामागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील सहा वर्षांपासून कालव्याला पाणी नसल्याने दुबार शेती इतिहासजमा झाली आहे, तर आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकंदरीत कालव्याकाठी आमचे गाव, पाण्यासाठी धावाधाव अशीच काहीशी बिकट अवस्था रोहे तालुक्यातील बाहे, सांगडे, उडदवणे, मुठवली, मालसई, धामणसई, गावठण, सोनगाव, वांदोली, मढाली, पिंगळसई तसेच या विभागातील आदिवासीवाडी, ठाकूरवाडी आदी भागातील जनतेची झाली आहे.संतप्त ग्रामस्थांनी प्रांतअधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती व पाटबंधारे विभागातील कार्यालयातील प्रमुखांना १८ एप्रिलला निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले व दोन-तीन दिवसांत कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती. मात्र या घटनेला दोन दिवस झाले तरी अद्याप दखल घेण्यात आली नाही. रोहे तालुक्यातील डोंगर दुर्गम भागातील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या ग्रामीण भागात तीन-चार दिवसाआड पिण्यासाठी केवळ ३ ते ४ हंडे पाणी मिळत असल्याने पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रोहा तालुक्यातील सोनगाव येथील सोमेश्वर मंदिर येथे पंचक्रोेशीतील संतप्त ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी बैठक घेऊन विभागातील समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत विशेषत: पाण्याचा मुद्दा प्रमुख्याने गाजला. कालव्याला पाणी नसल्याने पंचक्रोशीतील पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामस्थांना फक्त एक ते दोन हंडे एवढेच पाणी मिळत आहे. ग्रामस्थांबरोबर गुरांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी विपुल पशुसंपत्ती व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळत असे, परंतु पाण्याअभावी हे व्यवसाय बंद झाले आहेत. शेतीत पीक नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावात गुरांसाठी कुंडलिकेचे पाणी भाड्याच्या टेम्पोने आणावे लागत आहे, तर कपडे धुण्यासाठी महिलांना चार ते पाच कि.मी. पायपीट करून कुंडलिका नदीवर हेलपाटे मारावे लागत आहेत.धामणसई पंचक्रोशीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यान्वित झाली, परंतु कालव्याला पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील सहा वर्षे येथील कालव्याला पाणी येत नसल्याने शेतजमीन ओसाड पडली आहे. त्यातच दुबार पीक इतिहासजमा झाले आहे. दरवर्षी दुबार पीक घेऊन उदरनिर्वाह करणारा शेतकरी आता मात्र शेतजमीन वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात जमीन बिल्डरांना विकली आहे. या सुपीक जमिनीवर एकेकाळी पीक घेणारे शेतकरी आता मात्र स्वत:ला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहे. अशी भयानक अवस्था येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांबद्दल सरकारला सहानुभूतीचा पाझर फुटणार कधी या प्रतीक्षेत हजारो ग्रामस्थ आहेत.