शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी हाल

By admin | Updated: April 21, 2017 00:26 IST

मागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी

मिलिंद अष्टिवकर,  रोहामागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील सहा वर्षांपासून कालव्याला पाणी नसल्याने दुबार शेती इतिहासजमा झाली आहे, तर आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकंदरीत कालव्याकाठी आमचे गाव, पाण्यासाठी धावाधाव अशीच काहीशी बिकट अवस्था रोहे तालुक्यातील बाहे, सांगडे, उडदवणे, मुठवली, मालसई, धामणसई, गावठण, सोनगाव, वांदोली, मढाली, पिंगळसई तसेच या विभागातील आदिवासीवाडी, ठाकूरवाडी आदी भागातील जनतेची झाली आहे.संतप्त ग्रामस्थांनी प्रांतअधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती व पाटबंधारे विभागातील कार्यालयातील प्रमुखांना १८ एप्रिलला निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले व दोन-तीन दिवसांत कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती. मात्र या घटनेला दोन दिवस झाले तरी अद्याप दखल घेण्यात आली नाही. रोहे तालुक्यातील डोंगर दुर्गम भागातील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या ग्रामीण भागात तीन-चार दिवसाआड पिण्यासाठी केवळ ३ ते ४ हंडे पाणी मिळत असल्याने पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रोहा तालुक्यातील सोनगाव येथील सोमेश्वर मंदिर येथे पंचक्रोेशीतील संतप्त ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी बैठक घेऊन विभागातील समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत विशेषत: पाण्याचा मुद्दा प्रमुख्याने गाजला. कालव्याला पाणी नसल्याने पंचक्रोशीतील पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामस्थांना फक्त एक ते दोन हंडे एवढेच पाणी मिळत आहे. ग्रामस्थांबरोबर गुरांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी विपुल पशुसंपत्ती व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळत असे, परंतु पाण्याअभावी हे व्यवसाय बंद झाले आहेत. शेतीत पीक नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावात गुरांसाठी कुंडलिकेचे पाणी भाड्याच्या टेम्पोने आणावे लागत आहे, तर कपडे धुण्यासाठी महिलांना चार ते पाच कि.मी. पायपीट करून कुंडलिका नदीवर हेलपाटे मारावे लागत आहेत.धामणसई पंचक्रोशीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यान्वित झाली, परंतु कालव्याला पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील सहा वर्षे येथील कालव्याला पाणी येत नसल्याने शेतजमीन ओसाड पडली आहे. त्यातच दुबार पीक इतिहासजमा झाले आहे. दरवर्षी दुबार पीक घेऊन उदरनिर्वाह करणारा शेतकरी आता मात्र शेतजमीन वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात जमीन बिल्डरांना विकली आहे. या सुपीक जमिनीवर एकेकाळी पीक घेणारे शेतकरी आता मात्र स्वत:ला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहे. अशी भयानक अवस्था येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांबद्दल सरकारला सहानुभूतीचा पाझर फुटणार कधी या प्रतीक्षेत हजारो ग्रामस्थ आहेत.