शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी हाल

By admin | Updated: April 21, 2017 00:26 IST

मागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी

मिलिंद अष्टिवकर,  रोहामागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील सहा वर्षांपासून कालव्याला पाणी नसल्याने दुबार शेती इतिहासजमा झाली आहे, तर आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकंदरीत कालव्याकाठी आमचे गाव, पाण्यासाठी धावाधाव अशीच काहीशी बिकट अवस्था रोहे तालुक्यातील बाहे, सांगडे, उडदवणे, मुठवली, मालसई, धामणसई, गावठण, सोनगाव, वांदोली, मढाली, पिंगळसई तसेच या विभागातील आदिवासीवाडी, ठाकूरवाडी आदी भागातील जनतेची झाली आहे.संतप्त ग्रामस्थांनी प्रांतअधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती व पाटबंधारे विभागातील कार्यालयातील प्रमुखांना १८ एप्रिलला निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले व दोन-तीन दिवसांत कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती. मात्र या घटनेला दोन दिवस झाले तरी अद्याप दखल घेण्यात आली नाही. रोहे तालुक्यातील डोंगर दुर्गम भागातील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या ग्रामीण भागात तीन-चार दिवसाआड पिण्यासाठी केवळ ३ ते ४ हंडे पाणी मिळत असल्याने पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रोहा तालुक्यातील सोनगाव येथील सोमेश्वर मंदिर येथे पंचक्रोेशीतील संतप्त ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी बैठक घेऊन विभागातील समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत विशेषत: पाण्याचा मुद्दा प्रमुख्याने गाजला. कालव्याला पाणी नसल्याने पंचक्रोशीतील पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामस्थांना फक्त एक ते दोन हंडे एवढेच पाणी मिळत आहे. ग्रामस्थांबरोबर गुरांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी विपुल पशुसंपत्ती व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळत असे, परंतु पाण्याअभावी हे व्यवसाय बंद झाले आहेत. शेतीत पीक नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावात गुरांसाठी कुंडलिकेचे पाणी भाड्याच्या टेम्पोने आणावे लागत आहे, तर कपडे धुण्यासाठी महिलांना चार ते पाच कि.मी. पायपीट करून कुंडलिका नदीवर हेलपाटे मारावे लागत आहेत.धामणसई पंचक्रोशीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यान्वित झाली, परंतु कालव्याला पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील सहा वर्षे येथील कालव्याला पाणी येत नसल्याने शेतजमीन ओसाड पडली आहे. त्यातच दुबार पीक इतिहासजमा झाले आहे. दरवर्षी दुबार पीक घेऊन उदरनिर्वाह करणारा शेतकरी आता मात्र शेतजमीन वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात जमीन बिल्डरांना विकली आहे. या सुपीक जमिनीवर एकेकाळी पीक घेणारे शेतकरी आता मात्र स्वत:ला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहे. अशी भयानक अवस्था येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांबद्दल सरकारला सहानुभूतीचा पाझर फुटणार कधी या प्रतीक्षेत हजारो ग्रामस्थ आहेत.