शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंबा नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक

By admin | Updated: August 17, 2016 03:14 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांचे

पाली : मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पुलाच्या भारवाहन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांची वर्षानुवर्षे वाहतूक सुरू असताना याकडे केवळ बघ्याची भूमिका घेऊन संबंधित शासकीय यंत्रणा कानाडोळा करीत असेल तर सुदैवाने अकस्मीत अपघात झाला तर याला जबाबदार कोण? अशी चर्चा वाकण - पाली - खोपोली राज्यमार्गावरील अंबा नदीवरील असलेल्या पुलाच्या बाबतीत होताना दिसत आहे. तसेच अतिभार क्षमतेची अवजड वाहने आणि ओव्हरलोड वाळू , कोळसा व कॉइलची होणारी वाहतूक रोखण्यात यावी, अशी मागणी सुधागडवासीयांकडून होत आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग सुधागड-पाली यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांपैकी वाकण - पाली - खोपोली या राज्यमार्ग क्र . ९३वर एकूण चार पूल आहेत. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे या महामार्गांना जोडणारा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजल्या जाणाऱ्या पाली येथील अंबा नदीवरील पूल ७७ मीटर लांबीचा आहे. या पुलाचे बांधकाम १९५५मध्ये करण्यात आले आहे. जवळपास ६० वर्षे या पुलाला पूर्ण झाली आहेत. या पुलाची भारवाहन क्षमता फक्त १९ टन इतकीच आहे. तसेच पेडली येथील पुलाचे बांधकाम १९६५मध्ये झाले असून, त्याची लांबी ४२ मीटर आहे. जांभूळपाडा येथील पुलाचे बांधकाम १९५५मध्ये तर सागडे येथील पुलाचे बांधकाम १९६३मध्ये झालेले आहे. या सर्व पुलांची भारवाहन क्षमता फक्त १९ टन इतकीच आहे.या चारही पुलांचे बांधकाम दगडी असून, हे पूल जवळपास ५० ते ६० वर्षे पावसाला व अंबा नदीला आलेल्या पुराला तसेच १९८९मध्ये झालेल्या महाप्रलयाला तोंड देत आजही खंबीरपणे सेवा देत आहेत. या पुलांवरून जाणाऱ्या वाहनांची वाहन क्षमता व सध्या वाहतूक होत असलेल्या वाहतुकीचा भार यांचे गणित केले गेले नाही, तर महाड घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी1नांदगाव/ मुरूड : अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणजे साळाव पूल. या पुलाच्या शेजारी जेएसडब्ल्यू कंपनी असून, या पुलावरून ४० टन क्षमतेच्या अवजड वाहनांची वाहतूक होत असते, त्यामुळे हा महत्त्वाचा पूल लवकरच कमकुवत होऊन वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.2ही सत्य परिस्थिती शासनाच्या निदर्शनास यावी म्हणून ‘आपले सरकार’ या शासनाच्या वेब साईटवर तक्र ार दाखल केल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष आशिष दिवेकर यांनी दिली. याबाबतची तक्र ार त्यांनी गृह विभाग परिवहन व बंदरे व सार्वजनिक बांधकाम खाते मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे.3आशिष दिवेकर म्हणाले की, साळाव पूल हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या पुलामुळे मुंबई जवळ आली असून, पर्यटकसंख्या वाढून मुरूड तालुक्याचा विकास होण्यास मदत झाली आहे. जेएसडब्लू कंपनी या पुलाचा वापर अवजड वाहतुकीसाठी करते. ४० टन क्षमतेचे ट्रक या पुलावरून ये- जा करीत असल्याने हा पूल कमकुवत झाला आहे.