शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

आधी पॅकेज, मगच सर्वेक्षण

By admin | Updated: January 6, 2015 22:14 IST

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे.

हितेन नाईक ल्ल पालघरसमुद्रातील तेलसाठ्याचा शोध घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे. मासेमारी बंदी कालावधीत होणाऱ्या नुकसानी व पुनर्वसनाबाबत शासनाने प्रथम पॅकेज जाहीर करावे नंतरच सर्वेक्षणाचा निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका कृती समितीसह मच्छीमार सहकारी संस्थांनी घेतली आहे.देशाच्या विकासाच्या बाबत घेतलेल्या जनहित कार्यक्रमाला आजपर्यंत मच्छीमारांनी नेहमीच सहकार्य केलेले आहे. मागील काही वर्षापूर्वी ओएनजीसीने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु त्याबाबत अजूनही मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे सर्र्वेक्षणामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत भरपाईची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायला मच्छीमार तयार नाहीत. या सर्र्वेेक्षणाच्या निर्णयाबाबत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या आदेशाने नेमलेल्या समन्वय समीतीत रामभाऊ पाटील, नरेंद्र पाटील, लिओ कोलॅसो इ. मच्छीमार नेत्यांना समाविष्ट करण्यात आले होते. परंतु आजपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाच्या निर्णयाबाबत समन्वय समितीसह कुठल्याही मच्छीमार सहकारी संस्थाना विश्वासात घेतले गेले नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजप्रमाणे शासनाने मच्छीमारांसाठी पॅकेजची घोषणा करावी तसेच विरोध असतानाही समुद्रात सर्वेक्षण सुरू केल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसान व जीवीतहानीस शासन जबाबदार असल्याचे पत्र वडराई, केळवा, माहिम, टेंभीच्या मच्छीमार सहकारी संस्थांनी सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त, पालघर (ठाणे) यांना दिले आहे. (वार्ताहर)असे होते सर्वेक्षण : ४पालघर तालुक्यातील एडवण, केळवा, माहीम, टेंभी, वडराई या मच्छीमारी गावांपासून ४० ते ५० नॉटीकल मैल सागरी अंतराच्या भागात ओएनजीसी या तेल प्रकल्प कंपनीकडून ६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत समुद्रातील तेल साठ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान एका महाकाय बोटीच्या पाठीमागे अर्धा ते एक किलोमिटर अंतराच्या तारेला मोठी उपकरणे, फ्लाटस लावलेले असतात. ही बोट सर्वेक्षणासाठी सध्या एडवण ते वडराई दरम्यानच्या मच्छीमारी बोटी ज्या भागात मासेमारी करतात त्या भागामध्ये सर्वेक्षणासाठी फिरणार आहे. अशा वेळी समुद्रातील सर्वेक्षणाच्या इच्छीत स्थळी मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी आपल्या कवी (खुंटे) समुद्रात रोवले आहेत. एक कव मारण्यासाठी सध्या मच्छीमाराला २५ हजार ते १ लाख रू. पर्यंत खर्च येतो. त्याचे काय होणार?४पालघर जिल्ह्णातील वसई तालुका ते पालघर तालुक्यातील मच्छीमारांनी समुद्रात ३ ते ४ हजार कवी मारल्या असून सुमारे १७ दिवस चालणाऱ्या सर्वेक्षणामुळे या कवींचे मोठे नुकसान होणार आहे. तर पारंपारीक दालदा, वागरा, शहेनशहा, मगरी इ. पद्धतीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची संख्याही मोठी असून समुद्राच्या पृष्ठभागावर टाकलेली जाळी सर्वेक्षण जहाजाच्या तारेच्या दोरखंडामध्ये अडकल्यास मच्छीमाराचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच या महाकाय जहाजाच्या आड एखादी मच्छीमार बोट आल्यास जीवीतहानीची शक्यताही निर्माण होऊ शकते.