शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाकरिता दहा कॉलेजमध्ये संधी

By admin | Updated: April 21, 2017 00:30 IST

दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख वाढत चालल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी पनवेल परिसरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफने उच्चांक गाठला होता

कळंबोली : दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख वाढत चालल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी पनवेल परिसरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफने उच्चांक गाठला होता. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुलभ पारदर्शक व्हावी, या उद्देशाने आता शिक्षण विभागातर्फेयंदा केंद्रीभूत आॅनलाइन पद्धतीमुळे प्रवेश घेणे सुकर होणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना एका अर्जाद्वारे दहा महाविद्यालयांत पसंतीक्र म नोंदविता येणार असून प्रवेशाची संधी मिळेल. तसेच पहिल्या फेरीनंतर शाखा बदलण्याचा अधिकारही विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.पनवेल परिसरातील ठरावीक कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाकरिता अधिक ओढा असतो. त्याचबरोबर विद्यार्थी संख्या जास्त आणि जागा कमी असल्याने प्रवेशाकरिता अनेक अडचणी येतात. प्रवेश प्रक्रि येत गोंधळ निर्माण झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. गेल्या वर्षी कळंबोली येथील एका विद्यार्थिनीने ८२ टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळत नसल्याची भीती मनात घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरण विधानसभेत गाजले होते. त्याचबरोबर मुख्याध्यापकांना अटक झाली होती. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार आहे. याकरिता कनिष्ठ महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रक्रि येसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार असून त्याआधारे १५ जून ते १५ जुलै या कालावधीत चार फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रि या पूर्ण करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशाची यंदा प्रथमच आॅनलाइन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रि या होणार आहे.आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येसाठी शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. या प्रक्रियेविषयी प्रत्येक शाळेत माहिती पुस्तिका पोहोचविल्या जातील. प्रवेश प्रक्रि येस प्रारंभ होण्यापूर्वी कनिष्ठमहाविद्यालयांनी आपल्या युजर आयडी पासवर्डद्वारे आॅनलाइन नोंदणी केली आहे.मुख्याध्यापकांची बैठक काही दिवसांपूर्वी पनवेल आणि नवी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची ऐरोली येथे शिक्षण विभागाने बैठक बोलावली होती. उपसंचालक बी.बी. चव्हाण आणि सहाय्यक उपसंचालक अहिरे यांनी अकरावी प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. त्यांना विविध प्रकारचा सूचना यावेळी देण्यात आल्या असून शंभर टक्के प्रवेश आॅनलाइनच होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल्याची माहिती तालुका गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कार्यशाळा घेण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रि या नेमकी कशी असणार आहे याबाबत इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे.