शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

लोकशाही दिनी फक्त एकच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2015 00:14 IST

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय कार्यालयांमध्ये लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे

नवी मुंबई : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय कार्यालयांमध्ये लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे नागरिकांचा सहभाग कमी झाला असून सप्टेंबर महिन्यात फक्त एकच अर्ज प्राप्त झाला आहे. महापालिका व इतर शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने लोकशाही दिन सुरू केला आहे. या दिवशी आयुक्तांसह सर्व अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित असतात. नागरिकांना त्यांनी केलेल्या तक्रारीवर एक महिन्यात कारवाई करून लेखी उत्तर देण्यात येते. पूर्वी शहरातील सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी व नागरिक वैयक्तिक अडचणीचे व शहरातील समस्यांविषयी लोकशाही दिनामध्ये अर्ज करत होते. गणेशोत्सव काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही पाच दिवस सुट्टी देण्यात यावी या विषयाचा पाठपुरावाही राहुल पवार या कार्यकर्त्याने लोकशाही दिनाच्या माध्यमातून केला होता. पालिकेच्या अनेक संशयास्पद कामकाजाविषयी तक्रारी करून चौकशी करण्यास भाग पाडले होते. लोकशाही दिनातील तक्रारी वाढू लागल्यामुळे काही जणांनी ब्लॅकमेलिंगसाठी याचा वापर सुरू केल्याचा बहाणा करून शासनाने सामाजिक कार्यकर्त्यांना लोकशाही दिनात अर्ज करण्यास मज्जाव केला आहे. वैयक्तिक स्वरूपाचे अर्जच स्वीकारले जात आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांविषयीही अर्ज करता येत नाही. यामुळे आता एक किंवा दोन नागरिकच लोकशाही दिनामध्ये हजेरी लावत आहेत. जाचक अटी घातल्यामुळे हा उपक्रम फक्त नावापुरताच सुरू ठेवण्यात आल्याविषयी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.