शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

लोकशाही दिनी फक्त एकच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2015 00:14 IST

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय कार्यालयांमध्ये लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे

नवी मुंबई : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय कार्यालयांमध्ये लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे नागरिकांचा सहभाग कमी झाला असून सप्टेंबर महिन्यात फक्त एकच अर्ज प्राप्त झाला आहे. महापालिका व इतर शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने लोकशाही दिन सुरू केला आहे. या दिवशी आयुक्तांसह सर्व अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित असतात. नागरिकांना त्यांनी केलेल्या तक्रारीवर एक महिन्यात कारवाई करून लेखी उत्तर देण्यात येते. पूर्वी शहरातील सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी व नागरिक वैयक्तिक अडचणीचे व शहरातील समस्यांविषयी लोकशाही दिनामध्ये अर्ज करत होते. गणेशोत्सव काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही पाच दिवस सुट्टी देण्यात यावी या विषयाचा पाठपुरावाही राहुल पवार या कार्यकर्त्याने लोकशाही दिनाच्या माध्यमातून केला होता. पालिकेच्या अनेक संशयास्पद कामकाजाविषयी तक्रारी करून चौकशी करण्यास भाग पाडले होते. लोकशाही दिनातील तक्रारी वाढू लागल्यामुळे काही जणांनी ब्लॅकमेलिंगसाठी याचा वापर सुरू केल्याचा बहाणा करून शासनाने सामाजिक कार्यकर्त्यांना लोकशाही दिनात अर्ज करण्यास मज्जाव केला आहे. वैयक्तिक स्वरूपाचे अर्जच स्वीकारले जात आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांविषयीही अर्ज करता येत नाही. यामुळे आता एक किंवा दोन नागरिकच लोकशाही दिनामध्ये हजेरी लावत आहेत. जाचक अटी घातल्यामुळे हा उपक्रम फक्त नावापुरताच सुरू ठेवण्यात आल्याविषयी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.