शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मनपाचा उपक्रम

By admin | Updated: September 1, 2015 04:43 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

नवी मुंबई : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बुध्द्यांक वाढावा या दृष्टीने प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी खास मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ज्या मुलांची शैक्षणिक पात्रता इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रश्नपत्रिका कशी तयार करावी, प्रश्नांची आखणी कशी करावी, प्रश्नांचे स्वरूप,चाचणी परीक्षेची उजळणी कशी करावी या संदर्भात सोमवारी महानगरपालिकेतील पहिली ते आठवीच्या शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आाले. २२ जून रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे. या संकल्पनेनुसार मुलांच्या प्रगतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही पुढाकार घेतला असून याअंतर्गत तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये सप्टेंबरमध्ये पहिली पायाभूत चाचणी, त्यानंतर प्रथम सत्र आणि मग द्वितीय सत्र अशा तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या तीनही चाचण्यांमध्ये भाषा आणि गणित या दोन विषयांचा समावेश असणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शुध्दलेखन, निबंधलेखन, तसेच विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढविण्याचे प्रयत्न करण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवता कामा नये यासाठी शिक्षकांनी आपल्या शिकविण्याच्या पध्दतीत काय बदल केला पाहिजे याबाबतही महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता जाणून घेतली जाणार असून अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.