शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

विमा योजनेतील कामगारांचा जीव धोक्यात

By admin | Updated: June 20, 2016 02:34 IST

राज्य विमा कामगार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे. असे असतानाही तीन धोकायदाक इमारतींमधील रहिवाशांना चौथ्या

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईराज्य विमा कामगार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे. असे असतानाही तीन धोकायदाक इमारतींमधील रहिवाशांना चौथ्या धोकादायक इमारतीमध्ये कोंबून मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याठिकाणच्या सुस्थितीतील इमारतीमध्ये रिक्त घरे असतानाही, केवळ त्या इमारती अधिकाऱ्यांसाठी असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना ताबा देण्यास नाकारले जात आहे.राज्य कामगार विमा योजनेच्या (कामगार रुग्णालय) वाशी सेक्टर ५ येथील रहिवासी वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. त्याठिकाणच्या ११ पैकी चार इमारती महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. या चारही इमारती विमा योजनेच्या फक्त कामगारांच्या वास्तव्यासाठी आहेत. मात्र या चारही इमारतींमध्ये सुमारे सात वर्षांपासून पडझड सुरूच आहे. इमारतीच्या खांबाचे सिमेंट निघून पडलेले आहे, तर भिंतीलाही तडे गेलेले असून अनेक ठिकाणी पडझड देखील झालेली आहे. यामुळे गेली कित्येक वर्षांपासून त्याठिकाणचे रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. सदर इमारतींची एकदाही डागडुजी झालेली नसल्यामुळे मोडकळीस आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र अधिकारी व डॉक्टरांसाठी असलेल्या उर्वरित ७ इमारतींची वेळोवेळी डागडुजी झालेली आहे. त्यामुळे वरिष्ठांच्याच भेदभावामुळे कामगारांच्या चार इमारतींची दुरवस्था झाल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतु शासनच दखल घेत नसल्यामुळे त्यांना रोजच मृत्यूच्या दाढेतून जावे लागत आहे. चारही इमारतींमध्ये प्रत्येकी ४० याप्रमाणे एकूण १६० घरे आहेत. परंतु निवृत्त झालेल्या कामगारांनी, तसेच निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी घरांचा ताबा सोडलेला आहे. यामुळे सद्य:स्थितीला निम्म्याहून अधिक घरे वापरात नाहीत. तर प्रत्येक इमारतीमध्ये किमान १० ते १५ याप्रमाणे चार इमारतींमध्ये एकूण सुमारे ४० ते ४५ कुटुंबेच सद्य:स्थितीला त्याठिकाणी राहत आहेत. इमारत राहण्यायोग्य नसल्याचे रहिवाशांकडून सांगूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नव्हती. अखेर महापालिकेनेच इमारत धोकादायक घोषित केल्यामुळे एकदाची सुटका होणार असे रहिवाशांना वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र झाले उलटेच. चक्क कामगारांच्या कुटुंबीयांना आडातून काढून विहिरीत ढकलण्याचाच प्रकार कामगार विमा योजनेच्या वरिष्ठांकडून सुरू आहे. याठिकाणी चारही इमारतींमध्ये सद्य:स्थितीला राहत असलेल्या सर्वांना स्थलांतर करणे शक्य आहे.असे असतानाही तीन इमारतींमधील रहिवाशांना धोकादायक असलेल्या चौथ्या इमारतीमध्ये जाण्यासाठी भाग पाडले जात आहे. परंतु ती इमारत देखील धोकादायक असल्यामुळे या स्थलांतराला विमा योजनेच्या कामगारांनी विरोध दर्शवला आहे. महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या चारही इमारतींचे छत कमकुवत असल्यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात छतावर साचणारे पाणी चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये ठिपकत असते. यंदाचा पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अद्याप त्याठिकाणच्या रहिवाशांची पर्यायी सोय झालेली नाही. यामुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कामगार रुग्णालयाच्या वाशीतील वसाहतीमध्ये वास्तव्य करणारे काही जण मुलुंडच्या रुग्णालयात काम करणारे देखील आहेत. त्यांना ऐन वेळी मुलुंडला स्थलांतर होण्याच्या सूचना मिळत आहेत.वरिष्ठांची दहशतभेडसावणाऱ्या समस्यांबाबत कामगारांनी आवाज उठवल्यास इतरत्र बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली. यापूर्वी अनेकांच्या झालेल्या बदल्या अशाच प्रकारातून झालेल्या असल्याचेही कामगारांचे म्हणणे आहे. तर केवळ बदलीच्याच भीतीपोटी मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून सहकुटुंब राहावे लागत आहे.११ इमारतींपैकी टाईप १ च्या चार इमारती कामगारांसाठी तर टाईप २ च्या चार व ३ च्या तीन इमारती अधिकारी व डॉक्टर यांच्यासाठी राखीव आहेत. अधिकारी व डॉक्टर यांच्यासाठी राखीव असलेल्या ७ इमारतींमध्ये बहुतांश घरे वापरात नाहीत.