शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कर्जतची पाणीयोजना मोजतेय अखेरची घटका

By admin | Updated: March 26, 2017 05:13 IST

शंभर टक्के सरकारी अनुदानातून १९९५मध्ये मंजूर झालेली कर्जत वाढीव पाणीयोजना आता नगरपालिकेच्या नियोजनाअभावी

कांता हाबळे / नेरळशंभर टक्के सरकारी अनुदानातून १९९५मध्ये मंजूर झालेली कर्जत वाढीव पाणीयोजना आता नगरपालिकेच्या नियोजनाअभावी तोट्यात चालली आहे. ही पाणीयोजना बंद पडल्यास कर्जतकरांचे पाण्यावाचून हाल होतील, यात शंका नाही. ही पाणीयोजना सुरळीत आणि कमी खर्चात कशी चालू ठेवता येईल, यासाठी पाणी सभापती लालधारी पाल, गटनेते राजेश लाड, शिवसेनेचे नगरसेवक संतोष पाटील, सोमनाथ ठोंबरे, मिलिंद चिखलकर आणि अभियंता गजभिये यांनी पाणीयोजनेची पाहणी करून उपाययोजनांवर चर्चा केली. कर्जत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ८० हजार नागरिकांना पुरेल, अशी पाणीयोजना १९९५मध्ये तत्कालीन शिवसेनेचे आमदार देवेंद्र साटम यांनी मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पूर्ण करून घेतली आणि कर्जतकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. पेज नदीला १२ महिने पाणी असल्याचा फायदा घेत नदीवर ही योजना सुरू करण्यात आली. पंपिंग स्टेशन आणि विहीर करून साधारण २० कि.मी. जलवाहिनीद्वारे कर्जत-दहिवली येथे बांधण्यात आलेल्या शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी आणून पुढे दहिवली, गुंडगे आणि कचेरीवर मोठ्या टाक्या बांधून पूर्ण कर्जत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००४मध्ये ही योजना कर्जत नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर योजना सुरू ठेवण्यासाठी कर्जत नगरपालिकेला खर्चाची कसरत करावी लागत आहे. या योजनेसाठी पंपिंग स्टेशनवर ८० एच.पी.च्या तीन मशिन बसवल्या आहेत. मात्र, मशिनची पात्रता कमी असल्यामुळे २४ तासांतील २० तास पाणीउपसा करण्यासाठी या मशिन चालू ठेवल्या जात आहेत. तसेच शुद्धीकरण प्रकल्पावर १२० एच.पी.च्या दोन मशिन बसवल्या असून, त्याही साधारण २० तास चालू ठेवल्या जाव्या लागत आहेत. रोज साधारण ४ एमएलडी, म्हणजे चाळीस लाख लिटर पाणीउपसा करावा लागत आहे; परंतु मशिनची क्षमता कमी असल्यामुळे त्या जास्त वेळ सुरू राहत असल्याने वीजबिल भरपूर येत आहे. वर्षाला ८० लाख रु पये वीजबिल हे पाणीयोजनेचे येत आहे. तसेच हे पंप आणि जलवाहिनी जुनी झाल्यामुळे त्याचा देखभालीचा खर्च वाढत आहे. देखभालीसाठी साधारण ६० लाख रुपये खर्च नगरपालिका वर्षाला करते. जास्त हॉर्सपॉवरच्या मशिन न घेतल्याने खर्च वाढत असल्याची चर्चा आहे. ६५ लाखांचा तोटा नगरपालिकेने शहरात एकूण ५२५० नळजोडण्या दिल्या आहेत. प्रत्येकी १५०० याप्रमाणे साधारण ६० लाख रु पये पाणीपट्टीद्वारे जमा होत आहेत; पण वीजबिल आणि देखभाल खर्च हा साधारण सव्वा कोटींपर्यंत आहे. म्हणजे साधारण, ६५ लाख रु पये तोट्यात पाणीयोजना चालू आहे. असून काही दिवस असे सुरू राहिल्यास नियोजनाअभावी पाणीयोजना बंद पडू शकते.