शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान

By admin | Updated: December 11, 2015 01:21 IST

तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे

कर्जत : तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे. कोंढाणेपासून अंबिवलीपर्यंत आणखी सहा मोठे सिमेंट बंधारे बांधण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयोजन आहे.कर्जत तालुक्यात वाहणारी उल्हास नदी सुरुवातीच्या टप्प्यात उन्हाळ्यात कोरडी असते. पुढे पेज नदीचे पाणी उल्हास नदीमध्ये जावून मिळते. त्यानंतर उल्हास नदी कल्याण खाडीपर्यंत जात असताना बारमाही होते. मात्र कोंढाणेच्या भागातील जंगलात उगम झालेल्या या उल्हास नदीचे पात्र पाणी कुठेही अडविले गेले नसल्याने उन्हाळ्यात कोरडे पडते. त्यामुळे सुरु वातीपासून या भागातील शेतकरी उन्हाळ्यात प्रचंड संकटात होते. सालपे, कोंदीवडे अशी पुढे तमनाथ भागात येणारी उल्हास नदी कोरडी असल्याने स्थानिक लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रासात असायचे, मात्र पाटबंधारे विभागाने कोंढाणेपासून चांदईपर्यंत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम केले, त्याचा परिणाम चांगला होऊन उन्हाळ्यात कोरडे असलेले उल्हास नदीचे पात्रपाणी साठ्यामळे भरु न गेले आहे. दुसरीकडे आणखी काही जागा आहे, तेथे पूर्वीचे सिमेंट बंधारे आहेत, परंतु ते मोडकळीस आले आहेत. अशा काही ठिकाणी भरपूर पाणी साठा होऊ शकतो. त्यामुळे प्राधान्याने त्या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. कर्जत पाटबंधारे विभागाने अशा काही साईट शोधून ठेवल्या होत्या आणि तेथे सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन देखील होते. मात्र कोंढाणेपासून चांदई-अंबिवलीपर्यंत सहा ठिकाणी बांधले जाणारे सिमेंट बंधारे गेली अनेक महिने प्रस्तावित आहेत. त्यांची कामे सुरु केल्यास उल्हास नदीच्या कोरड्या पात्रात झालेली जलक्र ांती सर्व परिसराच्या पाणीदृष्ट्या फायद्याची ठरेल. (वार्ताहर)