शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान

By admin | Updated: December 11, 2015 01:21 IST

तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे

कर्जत : तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे. कोंढाणेपासून अंबिवलीपर्यंत आणखी सहा मोठे सिमेंट बंधारे बांधण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयोजन आहे.कर्जत तालुक्यात वाहणारी उल्हास नदी सुरुवातीच्या टप्प्यात उन्हाळ्यात कोरडी असते. पुढे पेज नदीचे पाणी उल्हास नदीमध्ये जावून मिळते. त्यानंतर उल्हास नदी कल्याण खाडीपर्यंत जात असताना बारमाही होते. मात्र कोंढाणेच्या भागातील जंगलात उगम झालेल्या या उल्हास नदीचे पात्र पाणी कुठेही अडविले गेले नसल्याने उन्हाळ्यात कोरडे पडते. त्यामुळे सुरु वातीपासून या भागातील शेतकरी उन्हाळ्यात प्रचंड संकटात होते. सालपे, कोंदीवडे अशी पुढे तमनाथ भागात येणारी उल्हास नदी कोरडी असल्याने स्थानिक लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रासात असायचे, मात्र पाटबंधारे विभागाने कोंढाणेपासून चांदईपर्यंत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम केले, त्याचा परिणाम चांगला होऊन उन्हाळ्यात कोरडे असलेले उल्हास नदीचे पात्रपाणी साठ्यामळे भरु न गेले आहे. दुसरीकडे आणखी काही जागा आहे, तेथे पूर्वीचे सिमेंट बंधारे आहेत, परंतु ते मोडकळीस आले आहेत. अशा काही ठिकाणी भरपूर पाणी साठा होऊ शकतो. त्यामुळे प्राधान्याने त्या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. कर्जत पाटबंधारे विभागाने अशा काही साईट शोधून ठेवल्या होत्या आणि तेथे सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन देखील होते. मात्र कोंढाणेपासून चांदई-अंबिवलीपर्यंत सहा ठिकाणी बांधले जाणारे सिमेंट बंधारे गेली अनेक महिने प्रस्तावित आहेत. त्यांची कामे सुरु केल्यास उल्हास नदीच्या कोरड्या पात्रात झालेली जलक्र ांती सर्व परिसराच्या पाणीदृष्ट्या फायद्याची ठरेल. (वार्ताहर)