शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

हेक्टरी पन्नास हजार द्या!

By admin | Updated: July 18, 2015 23:26 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या

वाडा : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने वाड्याच्या तहसिलदारांकडे केली आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तसेच दुबार पेरणी करायला बियाणे नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बि-बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँका व सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. (वार्ताहर)विक्रमगडमध्ये गरवार भातरोपणीस विलंबविक्रमगड तालुक्यात पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवडयात हजेरी लावली खरी मात्र त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना नुसती हुलकावणी दिल्याने नांगरीसह भातपेरणीची कामे खोळंबली. पावसाचे काही खरे नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे अटपती घेतली आहेत. जुनच्या अखरेपर्यत हळवार भातरोपणीची कामे पुर्ण होऊन जुलै पंधरवडयापर्यत गरवार भातरोवणीची कामेही आटपट असतात. मात्र यंदा शेतामध्ये रोपणीसाठी पाणीच साठत नसल्याने हाळव्या भातरोपणीची कामे दयापही अपुर्ण आहेत़ त्यामुळे गरवार भातरोपणीस विलंब होत आहे़ आजमितीस शेतकरी जुलै अखेर लागवडीचे कामे पुर्ण करीत असतो, मात्र मुबलक पाऊस न झाल्याने लावणीची कामे पुर्ण झालेली नाही़ आज ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी लागवडची कामे पुर्ण केली आहेत. पावसाने पाठ दाखविल्याने शेतीसाठी लागणारे मजुर, खते, बि-बीयाणांच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे बळीराज पुरता मेटाकुटीला आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे.दुबार पेरणी अशक्य असल्याने एकरी २५०००/- नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, भुसंपादन कायदा रद्द करावा, सुका दुष्काळ जाहीर करावा़, आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणीवाडा तालुक्यात पेरण्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरण्यांसाठी आर्थिक पाठबळ नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. पाऊस झाला तरी भात लागवडीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे या वर्षी भातशेती होऊ शकत नसल्याने सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने तहसीलदारांकडे केली आहे.