शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:39 IST

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी

नवी मुंबई : मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी, रिलायन्स जिओ व खुद्द पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ हॅक झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक दक्ष झाली असून, या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.जुलै महिन्यामध्ये नवी मुंबई सायबर गुन्ह्यांनी हादरली. देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्सच्या जिओ कंपनीचा डाटा हॅक करण्यात आला. याविषयी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केले. आरोपीने पैसे मिळविण्यासाठी किंवा कंपनीचे नुकसान करण्यासाठी हा गुन्हा केला नसला, तरी मोठ्या उद्योगसमूहाची माहितीही सुरक्षित नसल्याचे त्यामुळे सिद्ध झाले. दुसºया गुन्ह्यामध्ये देशातील तिसºया क्रमांकाचे मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीमधील जीटीआय कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप हॅक करण्यात आले. कंपनीचा सर्व कारभार ठप्प होऊन गेला. या गुन्ह्यामध्ये हॅकर्सने कंपनीकडे खंडणीची मागणी केली असल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने न्हावा-शेवा पोलीस स्टेशनमध्ये आयटी अ‍ॅक्ट व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तिसºया घटनेमध्ये हॅकर्सने थेट नवी मुंबई पोलिसांना दणका दिला. एकाच आठवड्यात दोन वेळा पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळच हॅक करण्यात आले. पोलिसांच्या संकेतस्थळावर काहीही गुप्त माहिती नसली, तरी कायद्याच्या रक्षणकर्त्यांचे संगणक व संकेतस्थळही सुरक्षित नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. जीटीआय कंपनीचे संगणक हॅक केल्याच्या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे हस्तांतर करण्यात आला आहे; परंतु अद्याप या गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करणाºया आरोपीचाही अद्याप शोध लागलेला नाही. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, नवी मुंबईमध्ये आयटी उद्योग वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. नवी मुंबईमधील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. आयटी सेलमधील पोलीस अधिकाºयांसोबत या क्षेत्रामधील तज्ज्ञांचेही गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सहकार्य घेतले जात आहे. आयटी उद्योगांमधील तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने गुन्ह्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय राज्याच्या आयटी सेलचीही वेळोवेळी मदत घेतली जात आहे. नागरिकांनीही याविषयी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.