शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

आठ लोकल कमी, ‘मरे’वर १३२ फेऱ्यांची कमतरता

By admin | Updated: September 1, 2015 04:24 IST

वाढती प्रवासीसंख्या आणि रोजचीच लटकंती यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. मध्य रेल्वेची स्थिती अधिक बिकट असून

सुशांत मोरे, मुंबईवाढती प्रवासीसंख्या आणि रोजचीच लटकंती यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. मध्य रेल्वेची स्थिती अधिक बिकट असून, ही समस्या दूर करण्यासाठी लोकल आणि फेऱ्यांमध्ये वाढ करणे अपरिहार्य आहे. सध्या मध्य रेल्वेची मेन लाइन आणि ट्रान्स हार्बरवर १३२ फेऱ्यांची कमतरता आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेचा पसारा हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत आहे. हार्बरचा पनवेल आणि अंधेरी तर ट्रान्स हार्बरचा ठाणे ते पनवेलपर्यंत आहे. या सर्व मार्गांवरून सध्या १४२ लोकलमधून ४१ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही वर्षांतील प्रवासीसंख्येशी तुलना केली असता यात बरीच वाढ झाली आहे. २000-२00१ दरम्यान २७ लाख २0 हजार प्रवासी मध्य रेल्वेवरून प्रवास करीत होते. गेल्या १५ वर्षांत यात जवळपास १३ लाख ८0 हजार प्रवाशांची भर पडली आहे. या वाढत्या गर्दीचा प्रवास सुकर करण्यासाठी अधिक लोकलची गरज आहे. मेन लाइनवर ठाणे ते कर्जत, खोपोलीदरम्यान आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते पनवेल, वाशीदरम्यान प्रवासीसंख्येत बरीच वाढ झाली आहे. हे पाहता एकूण आठ लोकलची कमतरता मध्य रेल्वेला भासत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. यात मेन लाइनवर चार आणि ट्रान्स हार्बरवर चार लोकल कमी पडत असून, एकूण १३२ फेऱ्यांची कमतरता आहे. या फेऱ्या वाढल्यास मेन लाइनवर ठाण्यापुढील डाऊन दिशेला आणि ट्रान्स हार्बरवर बराच ताण पडत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सर्व बम्बार्डियर लोकल येणार असून, मध्य रेल्वेला सिमेन्स लोकल मिळतील आणि यातील काही लोकल आल्यावर बराचसा ताण कमी होऊ शकतो, अशी आशा अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली.