शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या चुकांची ५० वर्षे भोगतोय शिक्षा

By admin | Updated: March 15, 2017 02:41 IST

चुका शासन व प्रशासनाने केल्या. शिक्षा मात्र तब्बल ५० वर्षे प्रकल्पग्रस्तांना भोगावी लागत आहे. पहिल्यांदा जमीन घेऊन आम्हाला भू्मिहीन केले.

नामदेव मोरे , नवी मुंबई चुका शासन व प्रशासनाने केल्या. शिक्षा मात्र तब्बल ५० वर्षे प्रकल्पग्रस्तांना भोगावी लागत आहे. पहिल्यांदा जमीन घेऊन आम्हाला भू्मिहीन केले. आता बुल्डोझर फिरवून घरहीन करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर वसविताना गावठाणांना अक्षरश: वाळीत टाकले. सिडको व शासनाने नियोजनामध्ये केलेल्या चुकांमुळे गावे भकास झाली आहेत. गरजेपोटी बांधलेली घरे ही अतिक्रमण नसून शासकीय यंत्रणांच्या नियोजनातील चूक असून घरे नियमित करून सरकारने ही चूक सुधारावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. शासन, सिडको, महापालिका व एमआयडीसी विरोधात सुरू केलेल्या निर्णायक लढ्यामध्ये आगरी कोळी युथ फाऊंडेशनने अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. जवळपास दोन वर्षे प्रकल्पग्रस्त वकील, इंजिनीयर, सी.ए. डॉक्टर व इतर सुशिक्षित तरुणांची कोअर टीम ५० वर्षांपासून शासन व शासकीय यंत्रनेने केलेल्या अन्यायाविरोधात अभ्यास करत आहे. प्रत्येक मुद्द्यावर व प्रलंबित मागणीवर सखोल चर्चा करून तो प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने काय करावे. कोणत्या कायद्यान्वये प्रश्न सोडविण्यात येईल. कोणत्या मागण्यांसाठी कायद्याची कक्षा वाढवावी लागेल, याविषयी अभ्यास करण्यात आला आहे. निर्णायक लढा सुरू करण्यापूर्वी मागण्यांचे निवेदन व सर्व प्रश्न कसे सोडविता येतील? यासाठीच्या उपाययोजना यांचा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिडको, महापालिका व राज्य शासनास देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक फोकस गरजेपोटी बांधलेल्या घरांवर करण्यात आला आहे. शासनाने ९५ गावांमधील सर्व जमीन संपादित केली. प्रत्येक नोडचा विकास करण्याची योजना तयार करण्यात आली. विकसित नोडमध्ये उद्यान, मैदान, शाळा, महाविद्यालय. रुग्णालय व इतर सामाजिक सुविधा मिळतील याची काळजी घेण्यात आली. पुढील १०० वर्षांत शहर कसे वाढेल. जुन्या इमारती धोकादायक झाल्यानंतर त्यांच्या पुनर्विकासासाठी जादा एफएसआय व जमीन कशी उपलब्ध होईल, याचे नियोजन करण्यात आले; परंतु ज्यांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांची गावे विकासापासून वंचित ठेवण्यात आली. शहराबरोबर गावेही स्मार्ट झाली पाहिजेत, याचा विचारच केला नसल्याने आत्ताच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सिडको व शासनाने गावठाणांचा विकास आराखडा तयार केला नाही. साडेबारा टक्के योजनेचे भूखंड वेळेत वाटले नाहीत. ५० वर्षांमध्ये गावातील लोकसंख्या वाढली. जुनी घरे कमी पडू लागली व मोडकळीसही आली. जुनी घरे पाडून नवीन घरे बांधली व ती घरे सिडकोसह महापालिकेने अनधिकृत ठरविण्यास सुरुवात केली. सिडकोने जी चूक केली तीच चूक महापालिकेनेही केली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे गावांची अनियंत्रित वाढ झाली आहे. ही घरे पाडण्यापेक्षा ती नियमित कशी करता येतील याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्याच्गरजेपोटी बांधलेली घरे विनाअट तत्काळ कायम करणेच् मूळ गावठाण व विस्तारित गावठाणालगतच्या जमिनींचे सर्वेक्षण करावेच्सनदी उपरांत जी बांधकामे एमआरटीपी अंतर्गत नियमित होऊ शकतील त्यांना जादा एफएसआय देऊन नियमित करावीच्प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण शैक्षणिक पुनर्वसन होईपर्यंत ९५ गावांमधील प्रकल्पग्रस्तांना विद्यावेतन सुरू ठेवावेच्एमआयडीसी, सरकारी व खासगी अस्थापनांमध्ये नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावेच्खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशामध्ये आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावीच्प्रकल्प क्षेत्रामधील गृहनिर्माण प्रकल्प, गाळे वितरणामध्ये आरक्षण द्यावेच्नवी मुंबई, पनवेलमधील रूग्णालयांमध्ये सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळावेतच्प्रकल्पग्रस्तांना कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाची भरीव तरतूद करावीच्सार्वजनिक सुविधांसाठी पावणेचार टक्क कपात केलेले भूखंड प्रकल्पग्रस्त संस्थांना वितरित करावेच्एमआयडीसी बाधितांना पूर्वलक्षी प्रभावाने पुनर्वसन धोरण राबविण्यात यावे.