शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

नदीकिनाऱ्यावरही विकासकांचे लक्ष

By admin | Updated: May 15, 2016 03:57 IST

नैना परिसरामधील २३ गावांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. पनवेल शहराला लागून असलेल्या या परिसरामधून गाढी नदीही धावते.

नामदेव मोरे, नवी मुंबईनैना परिसरामधील २३ गावांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. पनवेल शहराला लागून असलेल्या या परिसरामधून गाढी नदीही धावते. विकासाचे नियोजन करताना नदीचे पात्र व त्याच्या बाजूला पुरेशी मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. तत्काळ हद्द निश्चिती केली नाही तर पात्रामध्येही अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडको कार्यक्षेत्रामध्ये विकासासाठी अत्यंत कमी जमीन शिल्लक आहे. भविष्यात या परिसरामध्ये विमानतळ येणार असल्याने विकासासाठी प्रचंड संधी निर्माण होणार आहे. भविष्यात या परिसराला प्राप्त होणारे महत्त्व वेळेत लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी नैना प्रभावित क्षेत्रामधील हजारो एकर जमीन विकत घेतली आहे. काही मोठ्या उद्योजकांनी १०० ते ३०० एकर जमीनही खरेदी करून ठेवली आहे. १५ वर्षांपासून अनेकांनी या परिसरामध्ये इमारतींचे बांधकाम करण्यासही सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेऊन अनेकांनी प्रकल्प उभारले. काहींनी परवानगी न घेताच प्रकल्प उभे केले आहेत. जमिनीला सोन्याची किंमत आल्याने एक इंचही जागा विकासक फुकट सोडण्यास तयार नाहीत. देहरंग धरणापासून गाढी नदी नैना परिसरामधून खाडीमध्ये जाऊन मिळते. निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे नदीकिनाऱ्यावर इमारती किंवा टाऊनशिप उभारण्याचे नियोजन अनेक व्यावसायिकांनी केले आहे. नदीच्या परिसरामध्ये विकासकामांना परवानगी देण्यापूर्वी प्रथम नदीचे पात्र निश्चित करण्यात यावे. मुसळधार पावसाच्या वेळी नदीचे पाणी जिथपर्यंत असते, त्यापासून काही मीटर अंतर सोडूनच परवानगी देणे आवश्यक आहे. परंतु अद्याप याविषयी ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. यामुळे १० वर्षांत नदीच्या पात्राला लागूनच मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. भविष्यात २६ जुलै २००५ प्रमाणे अतिवृष्टी झाली तर हा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नैना परिसरातील पहिल्या टप्प्यामधील आकुर्ली, बोर्ले, चिपले, कोप्रोली, पळस्पे, पाली देवद, उसर्ली खुर्द, विचुंबे, विहीघर या गावांमधील जमीन नदीच्या किनारी आहे. याशिवाय देहरंग धरणापर्यंत असणाऱ्या गावांमध्येही बांधकाम व्यावसायिकांनी जमीन खरेदी करून ठेवली आहे. पनवेलमधील वडघर, विचुंबे, सुकापूर या परिसरामध्ये नदीच्या काठावर बांधकामे झाली आहेत. काठाला लागून व काही ठिकाणी नदीपात्राशेजारी संरक्षण भिंत बांधून बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. १० वर्षांत सातत्याने नदीच्या बाजूच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारले जात आहेत. मुंबईमधील मिठी नदीप्रमाणे गाढीचे अस्तित्वही नष्ट होण्याची शक्यता असून, वेळेमध्येच नदी वाचविण्यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात पूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.