शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पर्यटनस्थळांसाठी कोट्यवधींचा निधी

By admin | Updated: March 26, 2017 05:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत

जयंत धुळप /अलिबागडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ३०.२१ कोटी रुपये खर्च करून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची २८ ठिकाणे व स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाकरिता प्रसिद्ध चरी गावासह महाड चवदार तळे आणि महाड क्रांतिस्तंभ या तीन ऐतिहासिक स्थळांचा समावेश असून, त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.जगाच्या पाठीवर १९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. याच शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत, सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. लोखंडी कुदळ (टिकाव) या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अवजारापासून झेप घेणाऱ्या गरूड पक्षाच्या आकाराचे अनोखे स्मारक उंबर्डे (पेण) येथील गतवर्षीचा ‘लोकमत-महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार प्राप्त शिल्पकार किशोर ठाकूर या कल्पकतेतून साकारले आहे. आता शासनाने जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या स्मारक विकास अनुदानातून येथे ग्रथालय, वाचनालय आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून या शेतकरी संपाच्या स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा संप१९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत,सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण आणि सभागृह नूतनीकरणच्२५ डिसेंबर १९२७ रोजीच्या महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मृती चिरंतन राहून येणाऱ्या नव्या पिढीला त्यांतून स्फूर्ती प्राप्त व्हावी, या हेतूने महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्याचबरोबर महाडमधीलच क्रांतिभूमी येथील शाहू महाराज सभागृहाचे नूतनीकरण करण्याकरिताही एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.