शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

जिल्ह्यात पर्यटनस्थळांसाठी कोट्यवधींचा निधी

By admin | Updated: March 26, 2017 05:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत

जयंत धुळप /अलिबागडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ३०.२१ कोटी रुपये खर्च करून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची २८ ठिकाणे व स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाकरिता प्रसिद्ध चरी गावासह महाड चवदार तळे आणि महाड क्रांतिस्तंभ या तीन ऐतिहासिक स्थळांचा समावेश असून, त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.जगाच्या पाठीवर १९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. याच शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत, सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. लोखंडी कुदळ (टिकाव) या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अवजारापासून झेप घेणाऱ्या गरूड पक्षाच्या आकाराचे अनोखे स्मारक उंबर्डे (पेण) येथील गतवर्षीचा ‘लोकमत-महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार प्राप्त शिल्पकार किशोर ठाकूर या कल्पकतेतून साकारले आहे. आता शासनाने जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या स्मारक विकास अनुदानातून येथे ग्रथालय, वाचनालय आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून या शेतकरी संपाच्या स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा संप१९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत,सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण आणि सभागृह नूतनीकरणच्२५ डिसेंबर १९२७ रोजीच्या महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मृती चिरंतन राहून येणाऱ्या नव्या पिढीला त्यांतून स्फूर्ती प्राप्त व्हावी, या हेतूने महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्याचबरोबर महाडमधीलच क्रांतिभूमी येथील शाहू महाराज सभागृहाचे नूतनीकरण करण्याकरिताही एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.