शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

कचऱ्यापासून सीएनजी

By admin | Updated: September 1, 2015 04:43 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमधून रोज जवळपास ८० टन ओला कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यातून सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमधून रोज जवळपास ८० टन ओला कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यातून सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारावा असा प्रस्ताव महापालिकेने एपीएमसीला दिला असून प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. येथील विविध मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी १२ हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. कांदा, भाजी व फळ मार्केटमध्ये रोज ७०० ते ८०० वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत असतो. या तीन मार्केटमधून रोज जवळपास ८० टन कचरा तयार होत असतो. हा कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत असतो. यापूर्वी बाजार समिती प्रशासनाने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही केले होते. परंतु प्रशासनास सिडकोकडून जागाच उपलब्ध झाली नसल्यामुळे तो प्रकल्प बारगळला होता. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गत आठवड्यात बाजार समितीला भेट देवून पाहणी केली. येथील अनधिकृत बांधकाम, कचरा व इतर गोष्टींची पाहणी केली. तीन मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात ओला कचरा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कचऱ्यावर प्रक्रिया केली तर सीएनजी गॅस तयार होवू शकतो अशी संकल्पना त्यांनी प्रशासनासमोर मांडली. बाजार समितीने स्वत: हा प्रकल्प राबवावा नाहीतर महापालिकेस तो राबविण्याची सहमती द्यावी असेही त्यांनी सुचविले.