शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत बालगृहांची पुन्हा तपासणी!

By admin | Updated: May 14, 2016 01:21 IST

महसूल विभागाच्या पथकाकडून आॅगस्ट-सप्टेंबर २०१५मध्ये राज्यातील स्वयंसेवी बालगृहांची झाडाझडती करणारी २०० गुणांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली.

स्नेहा मोरे,  मुंबईमहसूल विभागाच्या पथकाकडून आॅगस्ट-सप्टेंबर २०१५मध्ये राज्यातील स्वयंसेवी बालगृहांची झाडाझडती करणारी २०० गुणांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीनंतर प्रलंबित भोजन अनुदान, इमारत भाडे आणि कर्मचारी वेतन देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र राज्य शासन ते पूर्ण करू शकले नाही. याउलट, समस्यांनी वेढलेल्या बालगृहांची आठ महिन्यांत दुसऱ्यांदा तपासणी करण्याचा बडगा उगारण्यात आला आहे. बाल न्याय अधिनियम आणि पर्यायाने कायदा धाब्यावर बसवून जिल्हानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत.राज्यातील अनाथ, निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या बालगृहांचे प्रलंबित भोजन अनुदान, कर्मचारी वेतन व इमारत भाडे आदींची पूर्तता करणासाठी महिला व बालविकास विभागाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या २० फेब्रुवारी २०१५ परिपत्रकातील आदेशानुसार आॅगस्ट - सप्टेंबर २०१५मध्ये महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पथकाकडून सखोल तपासणी मोहीम राबविली. २०० गुणांच्या तपासणीत ९० टक्के गुण असणाऱ्या संस्थांना ‘अ’ श्रेणी, ८० टक्के गुण असणाऱ्या संस्थांना ‘ब’ श्रेणी आणि ७० टक्क्यांहून कमी गुण असणाऱ्या संस्थांना ‘क’ व ‘ड’श्रेणी देण्याची अजब पद्धतही वापरण्यात आली.दरम्यान, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महिला व बालविकास विभागाच्या अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या या तपासणी कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेची सुनावणी झाली. त्यानंतर ३० जून २०१५ला शासनाला तंबी देत महसूलच्या तपासण्यांच्या आधारे बालगृहांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे आदेश दिले. शिवाय, तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्यासही सांगितले. या याचिकेवर उच्च न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नसतानाही राज्याच्या महिला व बालविकास विभागाने अ, ब, क, ड श्रेणी जाहीर करून त्यानुसार बालगृहांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे. अवघ्या आठ महिन्यांतच पुन्हा बालगृह तपासणी सुरू करण्यात आली आहे. यंदा तर महसूल विभागासह समाज कल्याण विभागाचाही तपासणी मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००२ लागू केला. मात्र शासनाकडून तो पाळला जात नाही. महिला व बालविकास विभागाकडून बाल न्याय अधिनियमाची सररास पायमल्ली होत आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या संस्थाचे योग्य परिचालन होते का? बालकांच्या हिताची व अधिकारांची जोपासना होते का? बालगृहांत निकोप वातावरण आहे का? या बाबींचे निरीक्षण करण्यासाठी व त्या आधारे संबंधितांना सूचना देऊन सुधारण्याची संधी आणि अंतिमत: मान्यता निलंबित करण्याची कार्यवाही करण्याची या कायद्यात तरतूद आहे. ७ जणांचा समावेश असलेल्या या समितीत संस्था प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांसह मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करणे अंतर्भूत आहे. या सात जणांच्या निवडीची प्रक्रिया निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील राज्य सल्लागार मंडळाची निवड समिती पार पाडते. हे सर्व कायद्यात नमूद असूनही राज्याचा महिला व बालविकास विभाग या अधिनियमाला हरताळ फासत आहे.> तपासणीसाठी जिल्हानिहाय पथके सज्ज २९ एप्रिल २०१६ला पुणेस्थित महिला व बालविकास आयुक्तालयात विभागाची बैठक झाली. त्यात जिल्हानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. विभागाच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती कोकण उपविभागीय उपायुक्त कार्यालयाने कार्यक्षेत्रातील जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना चार सदस्यीय तपासणी पथके तयार करून आठ दिवसांत तपासण्या करण्याचे आदेश दिले. तसेच आयुक्तांना अहवाल सादर करण्याचा फतवा काढला आहे. चार सदस्यीय तपासणी पथकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, समाज कल्याण विभागाचा निरीक्षक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांचा समावेश करण्याचे उपविभागीय उपायुक्त कार्यालयाच्या फतव्यात सुचविण्यात आले आहे.