शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

२0२५ पर्यंत पाण्यासाठी हाहाकार माजणार

By admin | Updated: April 29, 2016 04:59 IST

पाण्याच्या मागणीचा वाढता वेग आणि मर्यादित उपलब्धता लक्षात घेता इ.स.२०२५ पर्यंत लोकांना १३.५ टक्के कमी पाणी मिळेल.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली-पाण्याच्या मागणीचा वाढता वेग आणि मर्यादित उपलब्धता लक्षात घेता इ.स.२०२५ पर्यंत लोकांना १३.५ टक्के कमी पाणी मिळेल. केंद्र सरकारने वाढती लोकसंख्या, उद्योग, शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीला यासाठी जबाबदार ठरविले आहे. दरम्यान सरकारने दुष्काळग्रस्त १० राज्यांना १२,८२७ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याचा दावा केला पण पाण्याच्या राज्यवार स्थितीची माहिती मात्र नाही.जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण राज्यमंत्री संवारलाल जट यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०११ मध्ये दरडोई १५४५ घनमीटर पाणी उपलब्ध होते. पण २०२५ पर्यत हे प्रमाण १३४० घनमीटरवर पोहोचेल. आधीच मर्यादित पाणी असताना वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरणाने त्यात आणखी घट होत आहे. प्रति व्यक्ती १७०० घनमीटरपेक्षा कमी पाणी असल्यास पाण्याची समस्या आणि १००० घनमीटरला तुटवडा मानला जातो. >महाराष्ट्रातील ३७ सिंचन योजना पूर्ण, २० रखडल्याजलसंसाधन राज्यमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राज्याच्या रायगड जिल्ह्यातील बाणगंगा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मदत मागण्यात आलेली नाही.याशिवाय महाराष्ट्रात १९९६-९७ पासून सुरू असलेल्या ६६ सिंचन प्रकल्पांपैकी केवळ ३७ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. यासाठी केंद्राने १०३६३.८ कोटी रुपयांची आर्थिक मदत कर्जाच्या रूपात केली आहे. सरकारच्या सिंचन प्रकल्पावरील खर्चात झालेल्या वारेमाप वाढीकडे लक्ष वेधले असता जट म्हणाले की, इ.स. २०१२ मध्ये राज्य सरकारने डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.या समितीने प्रकल्प खर्चात असामान्य वाढीला दरवाढ, वाढते भूसंपादन, पुनर्वसन खर्चातील वाढ आणि कार्यक्षेत्रातील बदल कारणीभूत असल्याचे सांगितले होते. समितीच्या अहवालावर राज्य सरकारकडून कारवाई व्हायची आहे.