शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२0२५ पर्यंत पाण्यासाठी हाहाकार माजणार

By admin | Updated: April 29, 2016 04:59 IST

पाण्याच्या मागणीचा वाढता वेग आणि मर्यादित उपलब्धता लक्षात घेता इ.स.२०२५ पर्यंत लोकांना १३.५ टक्के कमी पाणी मिळेल.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली-पाण्याच्या मागणीचा वाढता वेग आणि मर्यादित उपलब्धता लक्षात घेता इ.स.२०२५ पर्यंत लोकांना १३.५ टक्के कमी पाणी मिळेल. केंद्र सरकारने वाढती लोकसंख्या, उद्योग, शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीला यासाठी जबाबदार ठरविले आहे. दरम्यान सरकारने दुष्काळग्रस्त १० राज्यांना १२,८२७ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याचा दावा केला पण पाण्याच्या राज्यवार स्थितीची माहिती मात्र नाही.जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण राज्यमंत्री संवारलाल जट यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०११ मध्ये दरडोई १५४५ घनमीटर पाणी उपलब्ध होते. पण २०२५ पर्यत हे प्रमाण १३४० घनमीटरवर पोहोचेल. आधीच मर्यादित पाणी असताना वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरणाने त्यात आणखी घट होत आहे. प्रति व्यक्ती १७०० घनमीटरपेक्षा कमी पाणी असल्यास पाण्याची समस्या आणि १००० घनमीटरला तुटवडा मानला जातो. >महाराष्ट्रातील ३७ सिंचन योजना पूर्ण, २० रखडल्याजलसंसाधन राज्यमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राज्याच्या रायगड जिल्ह्यातील बाणगंगा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मदत मागण्यात आलेली नाही.याशिवाय महाराष्ट्रात १९९६-९७ पासून सुरू असलेल्या ६६ सिंचन प्रकल्पांपैकी केवळ ३७ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. यासाठी केंद्राने १०३६३.८ कोटी रुपयांची आर्थिक मदत कर्जाच्या रूपात केली आहे. सरकारच्या सिंचन प्रकल्पावरील खर्चात झालेल्या वारेमाप वाढीकडे लक्ष वेधले असता जट म्हणाले की, इ.स. २०१२ मध्ये राज्य सरकारने डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.या समितीने प्रकल्प खर्चात असामान्य वाढीला दरवाढ, वाढते भूसंपादन, पुनर्वसन खर्चातील वाढ आणि कार्यक्षेत्रातील बदल कारणीभूत असल्याचे सांगितले होते. समितीच्या अहवालावर राज्य सरकारकडून कारवाई व्हायची आहे.