शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिगत कायद्यांची वैधता तपासता येणार नाही

By admin | Updated: February 7, 2016 03:09 IST

मुस्लिम व्यक्तिगत कायद्यांचा स्रोत पवित्र कुरआन हा असल्याने या कायद्यांची वैधता भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या निकषांवर तपासता येणार नाही, अशी भूमिका ‘जमियत-उलेमा-ई-हिंद’

नवी दिल्ली : मुस्लिम व्यक्तिगत कायद्यांचा स्रोत पवित्र कुरआन हा असल्याने या कायद्यांची वैधता भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या निकषांवर तपासता येणार नाही, अशी भूमिका ‘जमियत-उलेमा-ई-हिंद’ या भारतातील मुस्लिम धर्मगुरूंच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयापुढे घेतली आहे.मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या मुखाने त्रिवार उच्चार करून तलाक देणे व एकाहून अधिक विवाह करणे यासारख्या त्यांच्या व्यक्तिगत कायद्यांवर आधारित प्रथा भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांनुसार वैध आहेत का, हा विषय एका स्वतंत्र जनहित याचिकेच्या स्वरूपात तपासून पाहण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गेल्या वर्षी ठरविले. त्यानुसार ‘मुस्लिम विमेन्स क्वेस्ट फॉर इक्वालिटी’ या शीर्षकाने जनहित याचिका नोंदली गेली आहे.ही याचिका शुक्रवारी मुख्य न्यायाधीश तीर्थसिंग ठाकूर, न्या. ए. के. सिक्री व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे आली तेव्हा उलेमा संघटनेने त्यात सहभागी करून घेण्यासाठी जो अर्ज केला त्यात वरीलप्रमाणे भूमिका मांडण्यात आली. खंडपीठाने उलेमा संघटनेला औपचारिक प्रतिवादी करून घेतले. उलेमा संघटना, अ‍ॅटर्नी जनरल व राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (नाल्सा) यांना सहा आठवड्यांत उत्तरे सादर करण्यास सांगण्यात आले. मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यांची पाठराखण करणारे ‘आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ही या सुनावणीत सहभागी होण्याची शक्यता आहे. उलेमा संघटनेने त्यांच्या अर्जात म्हटले की, मुस्लिमांचे व्यक्तिगत कायदे प्रामुख्याने पवित्र कुरआनवर आधारलेले असल्याने राज्यघटनेच्या अनुच्छेद १३ मध्ये अभिप्रेत असलेल्या ‘प्रचलित कायद्यां’च्या कक्षेत ते येत नाहीत. त्यामुळे राज्यघटनेतील समानता आणि समान वागणूक यासारख्या मूलभूत हक्कांच्या निकषांवर या कायद्यांची वैधता न्यायालय तपासू शकणार नाही.राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ चा संदर्भ देत उलेमा संघटना म्हणते की, संपूर्ण भारतातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता तयार करण्याचा सरकारने प्रयत्न करावा, असे हा अनुच्छेद म्हणतो. परंतु हा अनुच्छेद केवळ राज्यकारभारासाठीच्या निर्देशांचा भाग असल्याने त्याची सक्तीने अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही. उलट हा अनुच्छेद भारतात विविध धर्मावलंबींसाठी त्यांच्या व्यक्तिगत कायद्यांच्या संदर्भात भिन्न भिन्न धर्मसंहिता अस्तित्वात असल्याची नोंद घेतो व सरकारला सर्वांसाठी समान अशी नागरी संहिता तयार करण्यात यश येईपर्यंत असे धर्माधिष्ठित व्यक्तिगत कायदे सुरूच राहतील असेही अप्रत्यक्षपणे सूचित करतो. उलेमा संघटनेच्या म्हणण्यानुसार तलाक आणि पोटगी या बाबतीत मुस्लिम महिलांना कोणतेही संरक्षण नाही, हा समजही चुकीचा आहे. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने समानतेच्या आधारावर मुस्लिम महिलांनाही पोटगीचा हक्क दिला. परंतु राजीव गांधी सरकारने १९८६ मध्ये ‘मुस्लिम विमेन (प्रोटेक्शन आॅफ राईट््स आॅन डायव्होर्स) अ‍ॅक्ट’ हा कायदा करून न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रखर विरोधामुळे नाजूक प्रश्न पुन्हा ऐरणीवरराज्यघटना लागू झाल्यानंतर लगेचच ‘हिंदू कोड बिला’च्या रूपाने हिंदूंचे धर्मशास्त्रांवर आधारित असलेले व्यक्तिगत कायदे संहिताबद्ध करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. मात्र समान नागरी कायदे करण्याच्या उद्देशाने मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचे धारिष्ट्य सरकारला झाले नाही. न्यायालयाने आता स्वत:हून हा विषय हाती घेतल्यावर त्यास होऊ घातलेला प्रखर विरोध हे हा विषय किती नाजूक व विस्फोटक आहे, याचेच द्योतक आहे. उजव्या विचारसरणीचे मोदी सरकार यावर आता कोणती भूमिका किती ठामपणे घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.