शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कापसाला उठाव नसल्याने भिवंडी कॉटन मार्केटवर परिणाम

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

भिवंडी : जागतिक बाजारातील मंदी उन्हाळ्यापर्यंत सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कापसाला योग्य भाव न मिळाल्याने त्याचा फटका शहरांतील कॉटन व्यापारी व यंत्रमाग धारकांना बसला आहे.

भिवंडी : जागतिक बाजारातील मंदी उन्हाळ्यापर्यंत सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कापसाला योग्य भाव न मिळाल्याने त्याचा फटका शहरांतील कॉटन व्यापारी व यंत्रमाग धारकांना बसला आहे.
शहर व परिसरांतील वातावरण कॉटन (सुती कापड) उत्पादनास योग्य असल्याने शहरांत अर्धेअधिक यंत्रमाग विविध प्रकारचे कॉटनचे कापड बनवित आहेत. कापसाला उठाव नसल्याने कॉटन सुताला भाव मिळत नाही. त्याचे भाव गडगडल्याने कापड बनविल्यानंतर त्यासही भाव मिळत नाही, अशी अवस्था कॉटन मार्केटची झाली आहे. कापसाला भाव न मिळाल्याने व त्याची उचल होत नाही़ यामुळे टेक्सटाईल इंडस्ट्रिमध्ये कापसाच्या गाठी पडून आहेत. कापसाच्या गाठीचे दर कमी करूनही तो न विकला गेल्याने शेतकरी विवंचनेत आहेत. तसेच कापड मार्केटमध्ये योग्य दर मिळत नसल्याने मुंबईचे कापड व्यापारी भिवंडीतील यंत्रमाग धारकांना कापड विणण्यासाठी बीम देत नाहीत. त्यामुळे काही कारखानदारांनी कामगार कपात केली आहे. व्यवसायात तग धरण्यासाठी कारखान्याच्या मालकांनी दोन शिफ्टची एक शिफ्ट करत कारखाने सुरू ठेवले आहेत. उन्हाळ्यात कॉटनची मागणी वाढण्याची शक्यता टेक्सटाईल मार्केटच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्याची वाट पाहत यंत्रमागधारक कारखान्याचा गाडा ढकलत आहेत.
राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेक्स्टाईल इंडस्ट्रिजमध्ये अशी संकटे येत असतात. त्याची लेखी नोंद सरकारच्या टेक्सटाईल विभागाकडे असली पाहिजे. त्याच प्रमाणे सरकारने कापूस शेतकर्‍यांपासून ते यंत्रमागधारक, यंत्रमाग कामगार व व्यापारी यांचीदेखील नोंद करून त्यांना मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी व स्थैर्य देण्यासाठी योजना जाहीर केली पाहिजे, असे टेक्सटाईल आभ्यासकांचे म्हणणे आहे.