शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

दुष्काळी भागातील स्थितीचा अभ्यास

By admin | Updated: April 29, 2016 05:02 IST

देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी परिस्थितीचा येत्या जूनपर्यंत केंद्रीय पथकांतर्फे अभ्यास करण्यात येईल

नवी दिल्ली : देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी परिस्थितीचा येत्या जूनपर्यंत केंद्रीय पथकांतर्फे अभ्यास करण्यात येईल आणि या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी ही पथके भावी कार्यवाहीसंबंधीची दीर्घकालीन योजना तयार करतील, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे.केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) आणि केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी) च्या पथकांना दुष्काळ निर्माण होण्यामागच्या कारणांचे विश्लेषण करणे आणि जलसंसाधनांच्या व्यवस्थापनाच्या आव्हानांची ओळख पटविण्याचे काम देण्यात आले आहे. ही पथके पाण्याच्या संदर्भातील माहिती आणि जलस्रोत पुन्हा भरण्यामधील अंतर शोधून काढेल, दीर्घकालीन उपाययोजना आणि संरक्षणाचे उपाय सुचवेल. त्यासोबतच पाणी वितरण मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या पुनर्स्थापनेबाबत सूचना करेल, असे या निवेदनात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>या पथकांना संभाव्य पर्यायांसाठी दीर्घकालीन कृती योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही पथके एक आठवड्याच्या आत आपला अहवाल सीडब्ल्यूसी आणि सीजीडब्ल्यूबीच्या अध्यक्षांना सादर करतील आणि हे अध्यक्ष आपल्या टिप्पणीसह हा अहवाल जल संसाधन मंत्रालयाकडे पाठवतील. ही प्रक्रिया जून २०१६ पर्यंत चालेल, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.>पाण्याचे संरक्षण, योग्य वापरासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर काम करीत असतात. यात केंद्र सरकार सिंचन आणि जलसंसाधनांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन योजनांच्या माध्यमाने तांत्रिक व आर्थिक सहकार्य करीत असते. >२०१३ साली केंद्रीय भूजल मंडळाने ८५ अब्ज घनमीटर पाण्याच्या भूमिगत संचयनासाठी योजनेचा आराखडा तयार केला होता. याअंतर्गत देशभरात पावसाचे पाणी जमा करण्यासाठी १.१ कोटी कृत्रिम संरचना उभारण्याचा प्रस्ताव होता. हा आराखडा सर्व राज्य सरकारांना पाठविण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.