शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दुष्काळी भागातील स्थितीचा अभ्यास

By admin | Updated: April 29, 2016 05:02 IST

देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी परिस्थितीचा येत्या जूनपर्यंत केंद्रीय पथकांतर्फे अभ्यास करण्यात येईल

नवी दिल्ली : देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी परिस्थितीचा येत्या जूनपर्यंत केंद्रीय पथकांतर्फे अभ्यास करण्यात येईल आणि या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी ही पथके भावी कार्यवाहीसंबंधीची दीर्घकालीन योजना तयार करतील, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे.केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) आणि केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी) च्या पथकांना दुष्काळ निर्माण होण्यामागच्या कारणांचे विश्लेषण करणे आणि जलसंसाधनांच्या व्यवस्थापनाच्या आव्हानांची ओळख पटविण्याचे काम देण्यात आले आहे. ही पथके पाण्याच्या संदर्भातील माहिती आणि जलस्रोत पुन्हा भरण्यामधील अंतर शोधून काढेल, दीर्घकालीन उपाययोजना आणि संरक्षणाचे उपाय सुचवेल. त्यासोबतच पाणी वितरण मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या पुनर्स्थापनेबाबत सूचना करेल, असे या निवेदनात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>या पथकांना संभाव्य पर्यायांसाठी दीर्घकालीन कृती योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही पथके एक आठवड्याच्या आत आपला अहवाल सीडब्ल्यूसी आणि सीजीडब्ल्यूबीच्या अध्यक्षांना सादर करतील आणि हे अध्यक्ष आपल्या टिप्पणीसह हा अहवाल जल संसाधन मंत्रालयाकडे पाठवतील. ही प्रक्रिया जून २०१६ पर्यंत चालेल, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.>पाण्याचे संरक्षण, योग्य वापरासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर काम करीत असतात. यात केंद्र सरकार सिंचन आणि जलसंसाधनांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन योजनांच्या माध्यमाने तांत्रिक व आर्थिक सहकार्य करीत असते. >२०१३ साली केंद्रीय भूजल मंडळाने ८५ अब्ज घनमीटर पाण्याच्या भूमिगत संचयनासाठी योजनेचा आराखडा तयार केला होता. याअंतर्गत देशभरात पावसाचे पाणी जमा करण्यासाठी १.१ कोटी कृत्रिम संरचना उभारण्याचा प्रस्ताव होता. हा आराखडा सर्व राज्य सरकारांना पाठविण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.