शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार वर्षभरापासून १० पारधी कुटुंबे वाळीत उपोषणाकडे सरकारची पाठ

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

फोटो मेल करत आहे.

फोटो मेल करत आहे.
.............
अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार
वर्षभरापासून १० पारधी कुटुंबे वाळीत
उपोषणाकडे सरकारची पाठ
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात असलेल्या भेंडा गावातील १० पारधी कुटुंबांना गेल्या वर्षभरापासून वाळीत टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. न्यायाच्या अपेक्षेने ५ फेब्रुवारीपासून ५ पीडित कुटुंबे आझाद मैदानात उपोषणास बसली आहेत. मात्र अन्यायाविरोधात लढा देणार्‍या कुटुंबांची साधी दखल घेण्याची तसदीही सरकारने घेतली नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
याप्रकरणी अधिक माहिती देताना पीडित सुभाष काळे यांनी सांगितले की, गावातील किशोर नवले या सवर्ण तरुणाने त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करत जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र खटला मागे घ्यावा, यासाठी सातत्याने कुटुंबियांवर दबाव टाकला जात आहे. गेल्या गेल्या वर्षभरापासून गावाने पारधी समाजाच्या १० कुटुंबांना वाळीत टाकले आहे. तरीही काळे यांनी खटल्यात साक्ष देणार असल्याचे सांगितले.
वाळीत टाकल्यानंतरही कुटुंब खटला मागे घेत नसल्याचे पाहून जानेवारी महिन्याच्या १८ तारखेला पीडित मुलीच्या आईला काही जणांनी जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी बाळू ढवळे, विलास ढवळे, आणि छाया ढवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाणीमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असल्याचे काळे यांनी सांगितले. भीतीपोटी १० कुटुंबांमधील ५ कुटुंबियांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हलाखीची परिस्थिती असलेल्या उर्वरित पाच कुटुंबांना कोणताही आधार नसल्याचे काळे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने या कुटुंबाचे पुणे जिल्ह्यातील सुदवाडी गावी पुनर्वसन करावे, अशी पीडित कुटुंबांची मागणी आहे. शिवाय उदरनिर्वाहासाठी काही जमीन द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
....................