शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

चुरशीच्या लढतीत शिवसेनेची............ जोड

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

मंचर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे.

मंचर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आणावी लागेल. पुढील पंचवीस वर्षांत शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता तसे नियोजन करावे लागेल. राजकीय नेतृत्वाने त्याची दखल यापूर्वीच घेतलेली दिसते. मात्र आता नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच अस्तित्वात येण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
बसस्थानकावर एक सुलभ शौचालय व शहरातील मोजक्या ठिकाणी असणार्‍या मुतार्‍या वगळता स्वच्छतागृहे कोठेच नाहीत. त्यातही महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. शहरात आता सार्वजनिक जागा फारशा राहिलेल्या नाहीत, मात्र तरीही भविष्यात स्वच्छतागृहे उभारावी लागतील. अर्थात ग्रामपंचायत प्रशासनाला निधी देण्यास काही मर्यादा आहेत. कचराप्रश्नही सोडवावा लागेल. शहरातील कचरा उचलून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मागे असणार्‍या डोंगरावर टाकला जातो. पूर्वी तो शिंदेवाडी गावच्या हद्दीत टाकला जायचा. मात्र ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला. शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने आता हा कचरा अलीकडे टाकला जातो.
भविष्यात या भागात बांधकामक्षेत्र वाढीस लागेल. त्या वेळी कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. नव्याने निवड झालेल्या सरपंच गांजाळे यांना प्रश्न आत्ताच लक्षात घ्यावे लागणार आहेत. शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असताना त्याची नोंद करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाही. छोट्या वस्त्यांवरील रस्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. शहरातील काही रस्त्यांची कामे झाली. त्या वेळी अतिक्रमणे काढण्यात आली. या व्यावसायिकांची पुनर्वसन करण्याची मागणी आहे. रस्त्याला भरणारा आठवडे बाजार इतरत्र हलविण्याच्या सूचना आहेत. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील.
लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या स्मारकाचा मुद्दा प्राधान्याने हाती घ्यावा लागेल. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीवर भर दिला पाहिजे. अर्थात गावाचा विकास करताना लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून जास्तीत जास्त निधी आणावा लागेल. शहराचा विकास आराखडा बनविला तर विकासकामे अधिक गतीने होतील.