शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाची गुणवत्ता वाढवणारा पायाभूत सुविधांचा संकल्प?

By admin | Updated: July 11, 2014 01:23 IST

गेल्या आठवडय़ात ‘लोकमत’च्या माध्यमातून आपण पायाभूत सुविधांच्या अभावांचा आढावा घेतला होता. त्यापासून आपल्याला होणा:या त्रसाबद्दलही जाणून घेतले होते.

चंद्रशेखर नेने 
गेल्या आठवडय़ात ‘लोकमत’च्या माध्यमातून आपण पायाभूत सुविधांच्या अभावांचा आढावा घेतला होता. त्यापासून आपल्याला होणा:या त्रसाबद्दलही जाणून घेतले होते. त्यादृष्टीने आता आपण या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंबंधी काही तरतूद आहे का, हे बघू या.  
उत्तम रस्त्यांमुळे माणूस जसा एखाद्या ठिकाणाहून दुस:या ठिकाणी जाऊ शकतो; सुलभतेने आणि सुरक्षितपणो मालवाहतूक करू शकतो. ग्रामसडक योजनेसाठी 14,389 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणो साडेआठ हजार किमीचे रस्ते बांधण्याची योजना व त्यासाठी 37,8क्क् कोटींची तरतूद आहे. या निधीतून प्रत्येक गावार्पयत अगदी सहजपणो रस्ता पोहोचेल. 
पिण्याचे पाणी ही दुसरी महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी 3,6क्क् कोटींची तरतूद केली आहे. परंतु ती पुरेशी आहे, असे म्हणता येणार नाही. सिंचनासाठी 1,क्क्क् कोटी राखून ठेवले आहेत, परंतु हा निधी सुद्धा पुरेसा नाही. या दोन्ही गरजांची पूर्तता प्रामुख्याने राज्यांनी करायची आहे. त्यामुळे या निधीचा विनियोग केंद्र सरकार दिशादर्शक प्रकल्पांसाठी करेल, अशी अपेक्षा आहे. स्वच्छ भारताचा संकल्प साकारण्यासाठी (शहरी स्वच्छता) 5क्,क्क्क् कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत. या निधीतून स्वच्छता अभियानाची उत्तम अंमलबजावणी करता येऊ शकेल. स्वच्छता योजनेचा एक अनुषंगिक फायदा म्हणजे नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी आपोआप घेतली जाईल. त्यामुळे निरोगी नागरिक राष्ट्राच्या उत्पादकतेमध्ये योगदान देतील. आरोग्यसंपन्न भारतामुळे वैद्यकीय खर्चात बचत होऊ शकेल.
शिक्षणासाठी या अर्थसंकल्पात विविध कलमांखाली मोठय़ा निधीची तरतूद केली आहे. मोदी सरकारने देशाची मोठी लोकसंख्या ही एक ‘लायबिलिटी’ न मानता ती ‘अॅसेट’ असल्याची भविष्यवेधी भूमिका घेतली आहे. या ‘अॅसेट’चे मूल्यवर्धन करण्यासाठी त्यांचे आरोग्य सुधारणो आणि कौशल्यात (स्किल) वाढ करणो ही सरकारने स्वत:ची प्राथमिक जबाबदारी मानली आहे. अर्थात सर्व पायाभूत सुविधांप्रमाणोच या गुंतवणुकीलाही फळे येण्यासाठी थोडा काळ द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला तेवढा धीर धरणो भाग आहे. 
 
‘स्मार्ट सिटीज’चे होणार फायदे 
खेडय़ातून विशिष्ट महानगरांमध्ये बेरोजगार तरुणांचा वाढता ओघ त्यामुळे थांबविता येईल. छोटय़ा शहरांना वेगळ्य़ा सेवासुविधा पुरविण्यामुळे  रोजगारांची निर्मिती होते. 
 
ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल, असे वाटते. विविध प्रकल्पांमधील गुंतवणुकींशिवाय इतर अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. देशाच्या सीमा विभागात उत्तम सुविधा उभारणो, ईशान्य भारतात रेल्वे आणि रस्ते उभारणी, संपूर्ण भारतात 24 तास वीजपुरवठा करणो, गरिबांसाठी मोठय़ा संख्येने स्वस्त घरे बांधणो (8,क्क्क् कोटींची तरतूद) इत्यादी प्रकल्पांचा त्यात अंतर्भाव आहे. त्यामुळे मोदी सरकारचे उद्दिष्ट जरी फार भव्यदिव्य असले तरीही त्याचे यश, सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत आणि सध्या तरतूद केलेल्या निधीतच पूर्ण होण्यात आहे.