शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

राजीव गांधींनी केली होती हायड्रोजन बॉम्ब चाचणीची तयारी - CIA

By admin | Updated: January 24, 2017 10:12 IST

भारताने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळादरम्यान 1985 मध्ये पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला सडेतोड उत्तर देण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब चाचणी करण्याची तयारी केली होती

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24 - भारताने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळादरम्यान 1985 मध्ये पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला सडेतोड उत्तर देण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब चाचणी करण्याची तयारी केली होती, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने दिली आहे. 
 
त्यावेळी दक्षिण आशियामध्ये आण्विक शस्त्रात्रांची स्पर्धा होण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेतील तत्कालीन रोनाल्ड रिगन सरकारने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी आणि तणाव कमी करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवण्याचा विचार केला होता.  
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीद्वारे (CIA)सार्वजनिक करण्यात आलेल्या जवळपास  9,30,000 गोपनीय दस्तऐवजांद्वारे ही माहिती समोर आली आहे.  
 
CIAने या दस्तऐवजांमधील 12 लाखांहून अधिक पाने ऑनलाईन पोस्ट केली आहेत. यात 1980च्या दशकादरम्यानची भारताच्या आण्विक शस्त्रात्रांच्या क्षमतेबाबतची मनोरंजक माहिती आहे.  भारतीय सुरक्षा अत्यंत चोख असल्याकारणाने भारताच्या आण्विक कार्यक्रमाबाबत तपशील हस्तगत करण्यात समस्यांचा सामना करावा लागला, असे एका दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.  
 
CIA ने सांगितले की, राजीव गांधी सरकारला ज्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी करू इच्छुक होते ती चाचणी,  11 वर्षांपूर्वी इंदिरा गांधी सरकारतर्फे करण्यात आलेल्या चाचणीपेक्षाही अधिक शक्तिशाली होती. भारत त्यावेळी आण्विक तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानपेक्षा कैकपटीने पुढे होता. राजीव गांधी आण्विक कार्यक्रमांना पुढे नेण्यास पुढाकार घेत नव्हते, मात्र 1985 सालच्या सुरुवातीला पाकिस्तानकडून आण्विक शस्त्रात्र बनवण्याच्या योजनेवर वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपला निर्णय बदलला.
 
त्यांनी 4 मे 1985 साली म्हटले होते की, 'पाकिस्तानकडून आण्विक शस्त्रात्र बनवण्यासाठी होणा-या प्रयत्नांनी भारताला न्युक्लिअर पॉलिसीचे पुनरावलोकन करण्यासाठी भाग पाडले आहे'. मुंबईमधील भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधील 36 संशोधकांच्या एका टीमने हायड्रोजन बॉम्बची निर्मित केली होती, असे CIA ने सांगितले. भारताकडून आण्विक शस्त्रात्रांसाठी प्लुटोनियम जमा करण्यात येत होता, असा दावाही CIA ने केला आहे. 
 
दरम्यान, CIAच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय, राजकीय आणि आर्थिक परिणामांच्या भीतीपोटी पाकिस्तानच्या न्युक्लियर प्लांट्सवर हल्ला केला गेला नाही.  एका दस्तऐवजात तर असे नमूद करण्यात आले आहे की, 'दीर्घकालीन भारतीय सुरक्षेत पाकिस्तानला नव्हे तर चीनला धोका असल्याचे मानले जात आहे'.
 
अमेरिका सरकारतर्फे पाठवण्यात येणा-या प्रतिनिधीसंदर्भातील दस्तऐवजात असे सांगण्यात आले आहे की, भारताला ही बाब मान्य नव्हती, मात्र तरीही त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी भारत तयार होता.  त्याकाळी दक्षिण आशियामध्ये पाकिस्तानला अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण सहकारी म्हणून मानले जायचे तर भारताला सोव्हिएत युनियनचा मित्र मानले जायचे.  
 
दरम्यान, तत्कालीन राजीव गांधी सरकारने  हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली नाही. 1998 मध्ये अटल बिहारी वाजयेपी सरकारने अणु बॉम्बची चाचणी केली होती. पाकिस्ताननंही यानंतर अशाप्रकारची चाचणी केली. CIAने असेही म्हटले की, 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानात झालेल्या युद्धापूर्वीची गोपनीय माहिती मिळू शकली असती.