शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार

By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST

(पान १)

(पान १)
.............
राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार
हायकोर्टाचे आदेश
मुंबई : मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर पुन्हा जुनेच पिवळे दिवे लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले. त्यामुळे राणीच्या रत्नहाराने आता मरिन ड्राईव्ह पुन्हा झळाळणार आहे. तर पिवळे दिवे काढण्याचा निर्णय घेणार्‍या भाजपला चांगलाच दणका मिळला असून, शिवसेनेची सरशी झाली आहे.
मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. याआधीही न्यायालयाने येथे लागलेले एलईडी दिवे काढून पुन्हा पिवळे दिवे लावण्याची सूचना केली होती. याचा पुनरुच्चार गुरूवारी खंडपीठाने नव्याने केला. मात्र एलईडी दिव्यांमुळे येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रण स्पष्ट दिसते. यामुळे विजेची बचत होते व एलईडी दिवे कमी खर्चाचे आहेत, असा दावा राज्य शासनाने गुरूवारी खंडपीठासमोर केला.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत शासनाने न्यायालयाने केलेल्या सुचनेचे समर्थन केले. तसेच न्यायालयाने आदेश दिल्यास आम्ही जुने दिवे लावू, असेही शासनाने स्पष्ट केले. त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. (प्रतिनिधी)
.....................
(चौकट)
शिवसेना-भाजपा वाद
१० कोटींची वीज वाचेल!
मुंबईतल्या रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर आला होता. रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर सुरु केल्यानंतर १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता. भाजपप्रणित योजनेला शिवसेनेने विरोध दर्शविल्याने त्याचे राजकारणात पडसाद उमटले होते.
.....................
(चौकट)
भाजपाचा सूर
शिवसेनेने राणीचा रत्नहार असलेले दिवे बदलण्यास विरोध दर्शविला असतानाच ही योजना पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारी आणि महापालिकेचा पैसा वाचविणारी असल्याचा सूर भाजपाने लावला होता.
.....................
(चौकट)
भाजपाचा दावा
आजघडीला मुंबईत बेस्ट, एमएसईबी आणि रिलायन्सचे मिळून सुमारे १ लाख ३२ हजार ४५८ दिव्यांचे खांब आहेत. त्यासाठी महापालिका दरवर्षी १६४ कोटी रुपये वीज बील भरते. या दिव्यांमुळे दरवर्षी २० कोटी युनिट वीज जळते. मात्र एलईडी दिव्यांचा वापर सुरु झाल्यास यातील निम्मे म्हणजे १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता.
.....................