शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

रेल्वे मार्गावर आता खाजगी मालगाड्या

By admin | Updated: April 12, 2017 00:21 IST

भारतीय रेल्वे लवकरच खाजगी कंपन्यांना आपल्या स्वत:च्या मालवाहू रेल्वे चालविण्याची परवानगी देणार आहे. हा निर्णय झाल्यास रेल्वे मार्गावरील सरकारची एकाधिकारशाही संपणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच खाजगी कंपन्यांना आपल्या स्वत:च्या मालवाहू रेल्वे चालविण्याची परवानगी देणार आहे. हा निर्णय झाल्यास रेल्वे मार्गावरील सरकारची एकाधिकारशाही संपणार आहे. रेल्वेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सिमेंट, स्टील, वाहन, पुरवठा, धान्य, रसायने आणि खते या क्षेत्रातील कंपन्यांनी विशेष मालवाहू रेल्वे वाहतूक योजने अंतर्गत आपल्या स्वत:च्या मालवाहू रेल्वे उभारण्यात रस दर्शविला आहे. खाजगी टर्मिनल वरून त्यांच्या रेल्वेंना परवानी देण्याचा विचार सुरू आहे. खाजगी टर्मिनलच्या माध्यमातून २0 ते २५ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक क्षमता उभी केली जाऊ शकते. कोळसा वगळता इतर सर्वच वस्तूंची मागणी वाढत आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे येऊन आपले स्वत:चे टर्मिनल उभे करण्यासाठी गुंतवणूक करावी, अशी आमची अपेक्षा आहे. स्वत:चे टर्मिनल उभे करण्याबरोबरच ते स्वत:च्या रेल्वेही चालवू शकतील.खाजगी मालवाहू रेल्वेचा प्रयोग यशस्वी झाल्यास खाजगी प्रवासी रेल्वेलाही परवानगी दिली जाऊ शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. टाटा स्टील, अदाणी अ‍ॅग्रो, कृभको आणि अन्य काही बड्या उद्योग समूहाचे स्वत:चे टर्मिनल सध्याही आहेत. सूत्रांनी दिेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशात ५५ खाजगी मालवाहू टर्मिनल उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यापोटी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. स्वत:चे टर्मिनल ते स्वत:ची मालवाहतूक- मालवाहू रेल्वे वाहतूक योजने अंतर्गत खाजगी कंपन्या भारतीय रेल्वेकडून रेक भाड्याने घेऊन चालवू शकतात. स्वत:चेच रेक उभारून ते स्वत:च्या सोयीनुसार चालविण्याची मुभाही त्यांना असेल. - सध्याच्या उपलब्ध रेल्वे मार्गावरून हे रेक चालविण्याची परवानी त्यांना असेल. स्वत:चे मालवाहू टर्मिनलवरून ते त्याद्वारे मालवाहतूक करू शकतील.