शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पाक ‘विशेष पसंती’ घालवणार?

By admin | Updated: September 28, 2016 01:27 IST

पाकिस्तानला देण्यात आलेल्या विशेष पसंतीचा देश (मोस्ट फेव्हर्ड नेशन-एमएफएन) या दर्जाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत

नवी दिल्ली : पाकिस्तानला देण्यात आलेल्या विशेष पसंतीचा देश (मोस्ट फेव्हर्ड नेशन-एमएफएन) या दर्जाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. सोमवारीच मोदी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदी पाणीवाटप कराराचा आढावा घेतल्यानंतर पाकिस्तानला दिलेल्या दर्जाचा आढावा घ्यायचा निर्णय घेतला. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकसोबतचे संबंध हे पूर्वीसारखे असणार नाहीत हे स्पष्ट केले आहे.पाकिस्तानला दिल्या गेलेल्या एमएफएन दर्जाचा आढावा घ्यायचा मोदी यांचा प्रयत्न हा पाकिस्तानला प्रत्यक्ष युद्धाऐवजी आर्थिक पातळीवर वेगळे पाडण्याच्या ठरवून चाललेल्या धोरणाचा भागच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारत पाकिस्तानला वेगळे पाडू इच्छितो याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून दिले जाऊ शकतात. अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय व्यापार तसा नगण्य असल्यामुळे पाकिस्तानवर त्याचा फार परिणाम होणार नाही. तथापि, व्यापक विचार करता भारताने पाकिस्तानबाबत राबवायच्या धोरणाचा फेरविचार सुरू केल्यामुळे हा निर्णय महत्वाचा ठरेल. मोदी पाकिस्तानला जागतिक व्यापार संघटनेच्या वाद निवारण मंडळापुढे उभे करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसे झाल्यास भारताने पाकिस्तानला दिलेल्या एमएफएन दर्जाअंतर्गत त्याला मिळणारे फायदे काढून घेण्यास भारताला परवानगी मिळेल. डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार देश त्यांच्या व्यापार भागीदार देशांशी सामान्य परिस्थिीत भेदभाव करू शकत नाहीत. कोणाला विशेष पसंती देणे (उदा. कस्टम्स ड्युटीचा दर त्यांच्या एखाद्या उत्पादनासाठी कमी करणे). आणि तुम्हाला अशी सवलत डब्ल्यूटीओच्या इतर सदस्यांनाही द्यावी लागते. (लोकमत न्यूज नेटवर्क)विशेष पसंतीचा दर्जा म्हणजे काय?भारताकडून पाकिस्तानला विशेष पसंतीचा देश दर्जा १९९६ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) गॅट (जनरल अ‍ॅग्रिमेंट आॅन टॅरीफस अँड ट्रेड) करारांतर्गतदिला गेला. भारत आणि पाकिस्तान यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. या कराराचा अर्थ असा की या दोन्ही देशांनी एकमेकांना सारखीच वागणूक द्यावी आणि डब्ल्यूटीओच्या सदस्य देशांना पसंतीचे व्यापारी भागीदार असे समजावे. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या केवळ ०.४ टक्केच आहे.