शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

जिल्‘ातील धरणात केवळ १७ टक्के जलसाठा बैठक : उद्योगांच्या पाणी कपातीबाबत आज बैठक

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

जळगाव : एप्रिल महिन्यातच पारा ४३ पर्यंत पोहचल्याने जिल्‘ातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहेत. सध्या हतनूर, गिरणा, वाघूर यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के तर छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत न्यायालयाने मद्य निर्मिती करणारे कारखाने व उद्योगांसाठी पाणी कपातीचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी याबाबत बैठक होत आहे.

जळगाव : एप्रिल महिन्यातच पारा ४३ पर्यंत पोहचल्याने जिल्‘ातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहेत. सध्या हतनूर, गिरणा, वाघूर यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के तर छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत न्यायालयाने मद्य निर्मिती करणारे कारखाने व उद्योगांसाठी पाणी कपातीचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी याबाबत बैठक होत आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के जलसाठा
जळगाव जिल्‘ात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यात हतनूर धरणात सध्या १६७.९० दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा ३४.९०० दलघमी आहे. या धरणात अवघा १३.६९ टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा धरणात ५७.५४ दलघमी पाणीसाठा आहे. मात्र उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. वाघूर धरणात २१५.५८० दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा १३८.८४० दलघमी असून ५५.८६ टक्के पाणीसाठा आहे. या तिन्ही मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के पाणीसाठा आहे.
छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा
जळगाव जिल्‘ात १३ छोटे प्रकल्प आहेत. त्यापैकी मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर सुकी धरणात ५६.५०, अभोरा धरणात ५२.८५, तोंडापूर धरणात १५.४२, मंगरुळ धरणात ७४.७२, मोर धरणात ६३.५७, गुळ धरणात १७.७१ टक्के जलसाठा आहे. छोट्या स्वरुपाच्या या धरणांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा आहे.
उद्योगांवर २० टक्के पाणी कपातीचे संकट
राज्यभरात पाणी टंचाईची भीषण समस्या असताना राज्य शासनातर्फे मद्य उत्पादन करणारे कारखाने तसेच उद्योगांना पाणी पुरवठा केला जात असल्याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मद्यनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचा २७ एप्रिलपासून ५० टक्के तर १० मे पासून ६० टक्के पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहे. तर इतर उद्योगांचे २७ एप्रिलपासून २० टक्के तर १० मे पासून २५ टक्के पाणी कपातीचे आदेश काढले आहेत. जळगाव जिल्‘ात मद्य निर्मिती करणारे कारखाने नाहीत. मात्र इतर उद्योगांवर २० टक्के पाणी कपातीचे संकट कायम आहे.