शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील धरणात केवळ १७ टक्के जलसाठा बैठक : उद्योगांच्या पाणी कपातीबाबत आज बैठक

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

जळगाव : एप्रिल महिन्यातच पारा ४३ पर्यंत पोहचल्याने जिल्‘ातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहेत. सध्या हतनूर, गिरणा, वाघूर यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के तर छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत न्यायालयाने मद्य निर्मिती करणारे कारखाने व उद्योगांसाठी पाणी कपातीचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी याबाबत बैठक होत आहे.

जळगाव : एप्रिल महिन्यातच पारा ४३ पर्यंत पोहचल्याने जिल्‘ातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहेत. सध्या हतनूर, गिरणा, वाघूर यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के तर छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत न्यायालयाने मद्य निर्मिती करणारे कारखाने व उद्योगांसाठी पाणी कपातीचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी याबाबत बैठक होत आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के जलसाठा
जळगाव जिल्‘ात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यात हतनूर धरणात सध्या १६७.९० दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा ३४.९०० दलघमी आहे. या धरणात अवघा १३.६९ टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा धरणात ५७.५४ दलघमी पाणीसाठा आहे. मात्र उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. वाघूर धरणात २१५.५८० दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा १३८.८४० दलघमी असून ५५.८६ टक्के पाणीसाठा आहे. या तिन्ही मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के पाणीसाठा आहे.
छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा
जळगाव जिल्‘ात १३ छोटे प्रकल्प आहेत. त्यापैकी मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर सुकी धरणात ५६.५०, अभोरा धरणात ५२.८५, तोंडापूर धरणात १५.४२, मंगरुळ धरणात ७४.७२, मोर धरणात ६३.५७, गुळ धरणात १७.७१ टक्के जलसाठा आहे. छोट्या स्वरुपाच्या या धरणांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा आहे.
उद्योगांवर २० टक्के पाणी कपातीचे संकट
राज्यभरात पाणी टंचाईची भीषण समस्या असताना राज्य शासनातर्फे मद्य उत्पादन करणारे कारखाने तसेच उद्योगांना पाणी पुरवठा केला जात असल्याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मद्यनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचा २७ एप्रिलपासून ५० टक्के तर १० मे पासून ६० टक्के पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहे. तर इतर उद्योगांचे २७ एप्रिलपासून २० टक्के तर १० मे पासून २५ टक्के पाणी कपातीचे आदेश काढले आहेत. जळगाव जिल्‘ात मद्य निर्मिती करणारे कारखाने नाहीत. मात्र इतर उद्योगांवर २० टक्के पाणी कपातीचे संकट कायम आहे.