शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वर्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

वर्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू

वर्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू
बल्लारपूर (जि़चंद्रपूर) : वर्धा नदीत नाव उलटल्याने हैदराबाद येथून बल्लारपूर येथे नातेवाईकाकडे आलेल्या एकाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. तर दहा वर्षीय मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध घेतला जात आहे. इतर चार जणांना वाचविण्यात यश आले. सदर घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथे घडली.
दर्शन यादगिरी गोल्लू (१८) असे मृताचे नाव असून, बेपत्ता असलेली हैदराबाद येथील स्नेहा अजय निलम (१०) हिचा शोध घेतला जात आहे. नारायणगुडा येथील रहिवासी अजय निलम, रोशन नातर, सानिया निलम, प्रशांत नालयम, दर्शन यादगिरी व स्नेहा निलम हे बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वॉर्डात राहणार्‍या नातेवाईकांकडे आले होते. महाशिवरात्री असल्याने ते वर्धा नदी घाटावर शिवमूर्ती पूजेसाठी गेले. पूजेनंतर त्यांनी नावेत बसून नदीत सैर करण्याचा बेत आखला. नाव चालक सुखलाल मोरे यांनी सहा जणांना नावेत बसवून नाव हाकलली. मात्र, नाव खोल पाण्यात गेल्यानंतर उलटली. यात नावेमध्ये बसलेले सर्व जण पाण्यात बुडाले. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड करताच नदी घाटावर असलेल्या बलबीर निशाद, रामधनी निशाद व राकेश निशाद तिघांनी पाण्यात उडी घेऊन अजय, सानिया, प्रशांत व सुखलाल यांना बाहेर काढले. मात्र, स्नेहा व दर्शन हे हाती लागू शकले नाही. (शहर प्रतिनिधी)