शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची पुनरावृत्ती नाही, रशियासोबत कराराआधी भारताची अट

By admin | Updated: March 9, 2017 09:49 IST

रशियासोबत लढाऊ विमानं निर्मिती करण्याच्या करोडो डॉलरच्या योजनेवर काम सुरु करण्याआधी भारताने एक महत्वाची अट ठेवली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - रशियासोबत लढाऊ विमानं निर्मिती करण्याच्या करोडो डॉलरच्या योजनेवर काम सुरु करण्याआधी भारताने एक महत्वाची अट ठेवली आहे. भारताने सांगितलं आहे की, जोपर्यंत रशिया तंत्रज्ञानाचं पुर्णपणे हस्तांतरण करण्यावर सहमती दर्शवत नाही तोपर्यंत जॉईंट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शनचं काम सुरु करण्यात येणार नाही. सुखोई विमानावेळी झालेल्या चुकीची भारताला पुनरावृत्ती करायची नाही, ज्यामध्ये पुर्णपणे तांत्रिक हस्तांतरीत करण्यात आलं नव्हतं. यामुळे आपल्याला स्वदेशी विमानांची निर्मिती करण्यात मदत मिळेल असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे. 
 
संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या सुत्रांनुसार सुखोई - 30MKI जेट विमानाच्या करारादरम्यान झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 55,117 कोटींच्या सुखोई करारात भारताने खूप मोठी चूक केली होती ती म्हणजे रशियाकडून पुर्णपणे तांत्रिक हस्तांतरण घेण्यात आलं नव्हतं. जर असं झालं असत तर याचा भारताला खूप मोठा फायदा झाला असता आणि राष्ट्रीय स्तरावरील निर्मिती क्षमतेत वाढ झाली असती. 
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'रशियाच्या मदतीने तयार होत असलेल्या 272 विमानांपैकी 240 विमानं हिंदुस्तान ऐरोनॉटिक्सने (एचएएल) तयार केली आहेत. हिंदुस्तान ऐरोनॉटिक्सने फक्त असेंम्बलिंगचं काम करत असून सर्व पार्ट्स रशियाहून आयात केले जात आहेत. हिंदुस्तान ऐरोनॉटिक्सने अद्यापपर्यंत आपल्या स्तरावर सुखोईचं उत्पादन करण्यास सक्षम नाही'.
 
हिंदुस्तान ऐरोनॉटिक्समध्ये तयार करण्यात येत असलेल्या एका सुखोई विमानाची किंमत 450 कोटींमध्ये जात आहे. तर रशियातून आयात विमानासाठी 100 कोटींचा खर्च होता आहे. पाचव्या जनरेशनमधील लढाऊ विमानांच्या निर्मितीवरुन रशियाकडून भारतावर दबाव आला जात असला तरी 127 सिंगल सीट असणा-या या विमानावर 25 अरब डॉलर खर्च करणं फायद्याचं आहे की नाही हे भारताला जाणून घ्यायचं आहे. या विमानांच्या कराराकरिता दोन्ही देशांनी 2007 मध्ये सहमती दर्शवली होती. यानंतर 2010 मध्ये 215 मिलिअन डॉलरचा करार झाला होता.
 
भारताच्या मुख्य दोन मागण्या - 
भविष्यात भारत आपल्या स्तरावर विमानांचं अपग्रेडेशन करु शकेल यासाठी या करारात पुर्ण तांत्रिक हस्तांतरण करण्याची सहमती आणि याशिवायय लढाऊ विमानं तयार करण्यासाठी स्वदेशी प्रोजेक्टमध्ये रशियाने मदत करावी अशा मुख्य दोन मागण्या भारताने ठेवल्या आहेत.