शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चुकीची पुनरावृत्ती नाही, रशियासोबत कराराआधी भारताची अट

By admin | Updated: March 9, 2017 09:49 IST

रशियासोबत लढाऊ विमानं निर्मिती करण्याच्या करोडो डॉलरच्या योजनेवर काम सुरु करण्याआधी भारताने एक महत्वाची अट ठेवली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - रशियासोबत लढाऊ विमानं निर्मिती करण्याच्या करोडो डॉलरच्या योजनेवर काम सुरु करण्याआधी भारताने एक महत्वाची अट ठेवली आहे. भारताने सांगितलं आहे की, जोपर्यंत रशिया तंत्रज्ञानाचं पुर्णपणे हस्तांतरण करण्यावर सहमती दर्शवत नाही तोपर्यंत जॉईंट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शनचं काम सुरु करण्यात येणार नाही. सुखोई विमानावेळी झालेल्या चुकीची भारताला पुनरावृत्ती करायची नाही, ज्यामध्ये पुर्णपणे तांत्रिक हस्तांतरीत करण्यात आलं नव्हतं. यामुळे आपल्याला स्वदेशी विमानांची निर्मिती करण्यात मदत मिळेल असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे. 
 
संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या सुत्रांनुसार सुखोई - 30MKI जेट विमानाच्या करारादरम्यान झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 55,117 कोटींच्या सुखोई करारात भारताने खूप मोठी चूक केली होती ती म्हणजे रशियाकडून पुर्णपणे तांत्रिक हस्तांतरण घेण्यात आलं नव्हतं. जर असं झालं असत तर याचा भारताला खूप मोठा फायदा झाला असता आणि राष्ट्रीय स्तरावरील निर्मिती क्षमतेत वाढ झाली असती. 
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'रशियाच्या मदतीने तयार होत असलेल्या 272 विमानांपैकी 240 विमानं हिंदुस्तान ऐरोनॉटिक्सने (एचएएल) तयार केली आहेत. हिंदुस्तान ऐरोनॉटिक्सने फक्त असेंम्बलिंगचं काम करत असून सर्व पार्ट्स रशियाहून आयात केले जात आहेत. हिंदुस्तान ऐरोनॉटिक्सने अद्यापपर्यंत आपल्या स्तरावर सुखोईचं उत्पादन करण्यास सक्षम नाही'.
 
हिंदुस्तान ऐरोनॉटिक्समध्ये तयार करण्यात येत असलेल्या एका सुखोई विमानाची किंमत 450 कोटींमध्ये जात आहे. तर रशियातून आयात विमानासाठी 100 कोटींचा खर्च होता आहे. पाचव्या जनरेशनमधील लढाऊ विमानांच्या निर्मितीवरुन रशियाकडून भारतावर दबाव आला जात असला तरी 127 सिंगल सीट असणा-या या विमानावर 25 अरब डॉलर खर्च करणं फायद्याचं आहे की नाही हे भारताला जाणून घ्यायचं आहे. या विमानांच्या कराराकरिता दोन्ही देशांनी 2007 मध्ये सहमती दर्शवली होती. यानंतर 2010 मध्ये 215 मिलिअन डॉलरचा करार झाला होता.
 
भारताच्या मुख्य दोन मागण्या - 
भविष्यात भारत आपल्या स्तरावर विमानांचं अपग्रेडेशन करु शकेल यासाठी या करारात पुर्ण तांत्रिक हस्तांतरण करण्याची सहमती आणि याशिवायय लढाऊ विमानं तयार करण्यासाठी स्वदेशी प्रोजेक्टमध्ये रशियाने मदत करावी अशा मुख्य दोन मागण्या भारताने ठेवल्या आहेत.